मुख्य बातम्या

‘लव्ह जिहाद’ व सक्तीच्या धर्मांतराविरोधात कठोर कायद्याची मागणी; शिरूर तहसीलदारांना निवेदन

(शिरूर अरुणकुमार मोटे): राज्यात कथित ‘लव्ह जिहाद’ तसेच बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांबाबत कठोर कायदा करण्याची मागणी करत सकल हिंदू समाज आक्रमक झाला आहे. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी (दि. १३ फेब्रुवारी २०२६) शिरूर येथे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना निवेदन सादर करण्यात आले.

आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, १४ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्र शासन यांनी ‘लव्ह जिहाद’ व सक्तीच्या धर्मांतराच्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी विशेष समिती स्थापन केली होती. मात्र, जवळपास एक वर्ष उलटूनही या संदर्भात कोणताही ठोस कायदा लागू करण्यात आलेला नसल्याने शासनाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली.

शासनाच्या दिरंगाईमुळे समाजात असंतोष वाढत असल्याचा आरोप करत मार्च महिन्यात होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात या संदर्भात कठोर कायदा मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच उत्तर प्रदेश आणि गुजरात राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही महिलांना संरक्षण देणारा प्रभावी कायदा लागू करावा, असे आंदोलनकर्त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

१३ फेब्रुवारी रोजी निवेदन सादर करूनही शासनाने सकारात्मक भूमिका न घेतल्यास राज्यभर तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या प्रसंगी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या दिपालीताई गव्हाणे, पंचायत समिती सदस्या विद्याताई भुजबळ, हिंदू जागरणचे मयूर सूर्यवंशी, हिंदू जनजागरण संस्थेचे अध्यक्ष सचिन पलांडे, शेखर भंडारी, उमेश शेळके, आबा पुरोहित, नाना लांडे, आकाश चाकणे आदी कार्यकर्ते व कार्यकर्त्या उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर शहरात वारंवार वीज खंडित; रोहित्रांची क्षमता वाढविण्याची नागरिकांची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील मारुती आळी, सरदार पेठ तसेच रामलिंग रोड परिसरात गेल्या काही…

8 मिनिटे ago

बारामतीकरांचा अभूतपूर्व कौल; सुनिल तटकरे यांचा मानाचा मुजरा, पश्चिम बंगाल परिवर्तनावरही भाष्य

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…

13 तास ago

बंगालमध्ये तृणमूल पिछाडीवर! वाघासारखं लढत राहू;  ममता बॅनरजी यांची प्रतिक्रिया

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…

14 तास ago

भोर नसरापूर प्रकरण! आरोपीला फाशीचीच शिक्षा होणार;  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर…

14 तास ago

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपावर काँग्रेसचा हल्लाबोल; सपकाळांचा गंभीर आरोप

मुंबई: काँग्रेस आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत मिळत होती, मात्र २०१४ नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर…

14 तास ago

नातं हृदयाशी; बायपास सर्जरी

बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन…

18 तास ago