पाबळ (सुनील जिते): शिरूर तालुक्यातील पाबळ व कान्हूर मेसाई परिसरातील विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गावाचा पाणीपुरवठा विस्कळित झाला असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पाबळ व कान्हूर मेसाई ही गावे दुष्काळग्रस्त म्हणून ओळखली जातात. उन्हाळ्यात येथील पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य विहिरी आणि इतर जलस्रोत कोरडे पडतात. त्यामुळे गाव व वाड्यावस्त्यांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. याशिवाय जनावरांसाठी चारा टंचाईचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
डोंगराळ भौगोलिक रचनेमुळे काही वाड्यांपर्यंत पाणी पोहोचवणेही कठीण झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल वाढले असून, त्वरित टँकरची सुविधा सुरू न केल्यास परिस्थिती आणखी गंभीर होईल, अशी चिंता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. , लवकर निर्णय न घेतल्यास परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे.
७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…
शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…
शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…