पाबळ (सुनील जिते): शिरूर तालुक्यातील पाबळ व कान्हूर मेसाई परिसरातील विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गावाचा पाणीपुरवठा विस्कळित झाला असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पाबळ व कान्हूर मेसाई ही गावे दुष्काळग्रस्त म्हणून ओळखली जातात. उन्हाळ्यात येथील पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य विहिरी आणि इतर जलस्रोत कोरडे पडतात. त्यामुळे गाव व वाड्यावस्त्यांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. याशिवाय जनावरांसाठी चारा टंचाईचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
डोंगराळ भौगोलिक रचनेमुळे काही वाड्यांपर्यंत पाणी पोहोचवणेही कठीण झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल वाढले असून, त्वरित टँकरची सुविधा सुरू न केल्यास परिस्थिती आणखी गंभीर होईल, अशी चिंता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. , लवकर निर्णय न घेतल्यास परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे.
मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…
मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…
गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…
मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…
मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…
प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…