मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात सर्व्हर डाऊनमुळे शेतकरी हैराण KYC अभावी शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान रखडले

पाबळ (सुनिल जिते) शासनाकडून दुष्काळी आर्थिक मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी (KYC) करणे अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु सर्व्हर डाऊन असल्यामुळे गेल्या दहा दिवसापासून शिरुर तालुक्यात केवायसी लिंक प्रणाली बंद आहे. परिणामी बँक खात्यात दुष्काळ निधी जमा होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

 

शिरुर मधील दुष्काळी सानुग्रह अनुदानासाठी कृषी विभागाकडून अर्ज भरून देण्यासाठी आव्हान केले होते. त्यानुसार शेतकऱ्यांनी अर्ज जमा केले. त्यानंतर शिरुर तालुक्यातील दुष्काळ गावांच्या यादी प्राप्त झाल्या. त्यानंतर ऑनलाइन पोर्टलला विशिष्ट क्रमांक टाकून केवायसी (KYC) करण्याचे काम सुरु झाले होते. परंतु रोजच सर्व्हर डाऊन असल्यामुळे गेल्या दहा दिवसापासून तालुक्यात केवायसी (KYC) लिंक प्रणाली बंद आहे.

 

शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात हाल होताना दिसून येत आहे. शिरुर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना काही दिवसापूर्वी शासनाकडून दुष्काळी आर्थिक मदत मिळण्यासाठी शेतकयांना ई-केवायसी (EKYC) करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी पदरचे पैसे खर्च करुन ई-सेवा केंद्राच्या ठिकाणी जात आहेत. मात्र लिंक बंद असल्याने केवायसी न करताच शेतकऱ्यांना परत जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्याला हेलपाटे मारावे लागत आहेत. केवायसी लिंक सुरु करून लवकरात लवकर खात्यात अनुदान जमा करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

 

दुष्काळी अनुदानासाठी सर्व्हर चालत नाही.त्यानुसार वरिष्ठ कार्यालयाला कळविले आहे. सध्या शासन स्तरावर काम सुरु असुन लवकरच केवायसी पोर्टल सुरु होईल अशी माहिती दिली आहे.

वैभव थोरात (महाईसेवा केंद्र मलठण )

 

वयाची ८० वर्ष पार करणाऱ्या आम्ही शेतकऱ्यांनी किती हेलपाटे घालावेत. आमचे बोटाचे ठसे उमटत नाही, यात शासनाने काहीतरी मार्ग काढावा.

एक वृद्ध शेतकरी (कान्हूर मेसाई)

शिरुर निकृष्ट पोषण आहार प्रकरण; अमोल कोल्हे म्हणाले, नक्की पोषण कोणाचं सुरु आहे…?

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिड महिन्यात दुसऱ्यांदा गोळीबार; पोलिसांचा धाक संपलाय का…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…

19 तास ago

घरातून रुसून निघालेल्या अल्पवयीन मुलाचा दौंड रेल्वे स्थानकावर सुखरूप शोध; समन्वयातून मोठी दुर्घटना टळली

दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…

20 तास ago

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…

1 दिवस ago

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

1 दिवस ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

2 दिवस ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

2 दिवस ago