पाबळ (सुनिल जिते) शासनाकडून दुष्काळी आर्थिक मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी (KYC) करणे अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु सर्व्हर डाऊन असल्यामुळे गेल्या दहा दिवसापासून शिरुर तालुक्यात केवायसी लिंक प्रणाली बंद आहे. परिणामी बँक खात्यात दुष्काळ निधी जमा होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
शिरुर मधील दुष्काळी सानुग्रह अनुदानासाठी कृषी विभागाकडून अर्ज भरून देण्यासाठी आव्हान केले होते. त्यानुसार शेतकऱ्यांनी अर्ज जमा केले. त्यानंतर शिरुर तालुक्यातील दुष्काळ गावांच्या यादी प्राप्त झाल्या. त्यानंतर ऑनलाइन पोर्टलला विशिष्ट क्रमांक टाकून केवायसी (KYC) करण्याचे काम सुरु झाले होते. परंतु रोजच सर्व्हर डाऊन असल्यामुळे गेल्या दहा दिवसापासून तालुक्यात केवायसी (KYC) लिंक प्रणाली बंद आहे.
शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात हाल होताना दिसून येत आहे. शिरुर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना काही दिवसापूर्वी शासनाकडून दुष्काळी आर्थिक मदत मिळण्यासाठी शेतकयांना ई-केवायसी (EKYC) करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी पदरचे पैसे खर्च करुन ई-सेवा केंद्राच्या ठिकाणी जात आहेत. मात्र लिंक बंद असल्याने केवायसी न करताच शेतकऱ्यांना परत जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्याला हेलपाटे मारावे लागत आहेत. केवायसी लिंक सुरु करून लवकरात लवकर खात्यात अनुदान जमा करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
दुष्काळी अनुदानासाठी सर्व्हर चालत नाही.त्यानुसार वरिष्ठ कार्यालयाला कळविले आहे. सध्या शासन स्तरावर काम सुरु असुन लवकरच केवायसी पोर्टल सुरु होईल अशी माहिती दिली आहे.
वैभव थोरात (महाईसेवा केंद्र मलठण )
वयाची ८० वर्ष पार करणाऱ्या आम्ही शेतकऱ्यांनी किती हेलपाटे घालावेत. आमचे बोटाचे ठसे उमटत नाही, यात शासनाने काहीतरी मार्ग काढावा.
एक वृद्ध शेतकरी (कान्हूर मेसाई)
शिरुर निकृष्ट पोषण आहार प्रकरण; अमोल कोल्हे म्हणाले, नक्की पोषण कोणाचं सुरु आहे…?
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…