शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथे थकबाकीसाठी बंद केलेल्या मीटरला बायपास करुन उच्चदाबाच्या रोहित्राला थेट केबल जोडून होणाऱ्या वीजचोरीचा महावितरणने ऑगस्ट-२०२३ मध्ये ड्रोनच्या सहाय्याने पर्दाफाश केला होता. याबाबत महावितरणतर्फे केडगाव पोलिसांत मुकेश अगरवाल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत वीजपुरवठा बंद केला. त्यानंतर प्रकरण कोर्टात गेल्याने जिल्हा सत्र न्यायालयाने वीजचोरीच्या दंडातील ७५ टक्के म्हणजेच १ कोटी १५ लाख रुपये रक्कम भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत करता येणार नसल्याचा आदेश नुकताच दिला असुन या आदेशाने वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.
सणसवाडी (ता. शिरुर) येथे श्री. मुकेश ओमप्रकाश अगरवाल (रा. अग्रसेन सोसायटी, कोरेगाव पार्क, पुणे) यांच्या मालकीच्या तीन वेगवेगळ्या कंपन्या आहेत. त्यापैकी थर्मोलाईट पॅकेजिंग इंडिया प्रा.लि आणि प्रकाश करुगेटेडे पुणे प्रा.लि ह्या दोन उच्चदाबाचे तर भगवान ट्यूब प्रा.लि. हे लघुदाब ग्राहक आहेत. तिन्ही कंपन्या एकाच आवारात व शेजारी-शेजारी आहेत. थकबाकीमुळे एका कंपनीचा कायमस्वरुपी तर दोन कंपन्यांचा वीजपुरवठा तात्पुरता बंद केलेला असताना संबंधित ग्राहकाने मीटरला बायपास करुन थेट रोहित्रातून वीजचोरी केली. महावितरणला याची कुणकुण लागताच 25 ऑगस्ट 2023 रोजी ही वीजचोरी महावितरणने मोठ्या शिताफीने उघडकीस आणली. त्यासाठी ड्रोनचीही मदत घेतली.
तीन पैकी दोन वीज जोडण्यांचा वीजपुरवठा सुरु करुन मिळावा म्हणून ग्राहकाने जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागितली होती. मा. न्यायालयाच्या आदेशानुसार वीजचोरी रकमेच्या ७५ टक्के रक्कम ग्राहकाला भरावयाची आहे. त्याशिवाय वीजपुरवठा जोडून मिळणार नसल्याने वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत. महावितरणतर्फे ॲड.सचिन खंडागळे व ॲड. गणेश डिंबळे यांनी बाजू मांडली.
मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…
ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…
मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…
अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…
फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…