मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात चारचाकी गाडी अडवून मारहाण करत जिवे मारण्याची धमकी

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील तर्डोबाची वाडी येथील मयुर लॉन्स मंगल कार्यालयातील लग्न समारंभ उरकुन चारचाकी गाडीने घरी जात असताना दुचाकी गाडीवरुन आलेल्या तीन जणांनी चारचाकी गाडी अडवत शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच चारचाकी गाडीवर दगडफेक करुन गाडीच्या काचा फोडल्याने यात चारचाकी गाडीतील एकजण जखमी झाला असुन याबाबत दादाभाऊ महादेव घेगडे (वय 37) रा. माठ, ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने अरबाज शेख याच्यासह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हे दाखल झाले आहेत.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार (दि 11) रोजी सायंकाळी 7:38 च्या सुमारास फिर्यादी दादाभाऊ घेगडे तर्डोबाची वाडी येथील मयुर लॉन्स मंगल कार्यालयात लग्न लावुन सोबत असलेले मित्र आणि त्यांचा भाऊ प्रविण घेगडे यांच्या चारचाकी स्कार्पिओ MH 12 MV 7407 मध्ये बसुन गोलेगाव-शिरुर रोडने त्यांच्या गावी माठ (ता. श्रीगोंदा) येथे जाण्यासाठी निघाले असता असता अचानक त्यांच्या पाठीमागुन एक दुचाकी बुलेट मोटार आली. त्यावर अरबाज शेख (रा. शिरुर ता. शिरुर, जि. पुणे आणि दोन अनोळखी इसम असे तिघेजण आले.

त्यांनी फिर्यादीच्या स्कार्पिओ गाडीच्या समोर बुलेट आडवी लावुन गाडी थांबविली आणि पप्पु राजापुरे व सुधीर घेगडेच्या नादी लागतो काय, असे म्हणत अरबाज शेख आणि त्याच्या सोबत असलेल्या दोन अनोळखी असे लोकांनी स्कार्पिओवर दगड फेकून मारले. त्यात दशरथ पाडुरंग पंदरकर यांना दगड लागल्याने ते जखमी झाले. तसेच पप्पु राजापुरेचे नादी लागलात तर गोळ्या घालून मारुन टाकीन अशी जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा पुढील तपास शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

2 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

2 तास ago

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…

2 तास ago

गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा उपक्रम; नामांकित मंडळांचा होणार सन्मान

मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…

3 तास ago

UPSC पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी CET-2026 प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…

3 तास ago

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीची दखल; ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाईचे आदेश

प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…

3 तास ago