मुख्य बातम्या

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक थांबावी, जनता दलाची साखर संचालकांकडे मागणी

शिरुर (तेजस फडके): सध्या राज्यात साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु आहे. मोठ्या प्रमाणात ऊस लागवडीचे क्षेत्र असून त्यात पाणी पातळी कमी होत चालली आहे. त्यामुळे ऊस वाळू नये व वेळेवर गाळपासाठी जावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. या त्यांच्या हतबलतेचा गैरफायदा तोडणी व वाहतूकदार घेत असुन ते शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणुक करत आहेत. तसेच शेतकऱ्यांनी याबाबत कारखान्याच्या व्यवस्थापणाशी संपर्क साधला असता ते लुबाडणुकदारांनाच पाठीशी घालत असल्याचे चित्र आज राज्यात दिसत आहे.

याबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा तसेच तोडणी व वाहतूकदारांनी शेतकऱ्यांकडे पैसे मागू नये आणि यापूर्वी काढलेल्या परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी राज्य जनता दलाच्या शिष्टमंडळाने एका निवेदनद्वारे साखर संचालक मंगेश तीटकारे यांच्याकडे केली आहे. या शिष्टमंडळामध्ये जनता दल सेक्युलर पक्षाचे जेष्ठ नेते व माजी आमदार प्रा. शरद पाटील, प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, सांगली जिल्हाध्यक्ष के.डी शिंदे व संजय आयनापुरे उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दरडग्रस्त भागांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मुंबई: मुंबई उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरातील डोंगराळ भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात घडणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे…

31 मिनिटे ago

डिजिटल परिवर्तनामुळे तंत्रशिक्षण प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम; ई-गव्हर्नन्स पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: राज्यातील तंत्रशिक्षण क्षेत्रात प्रशासन अधिक पारदर्शक, कार्यक्षम, उत्तरदायी आणि डेटा-आधारित करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात…

35 मिनिटे ago

शिरुर तालुक्यात सामाईक इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या भावाकडून मारहाण

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावात सामाईक वापरातील इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या…

4 तास ago

शिरुर तालुक्यातील भीषण अपघातात पत्नीच्या मृत्यू प्रकरणी; पतीवर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात एका महिलेचा मृत्यू…

4 तास ago

भाजलेल्या हरभऱ्याचे फायदे

चणे हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. रोज भाजलेले हरभऱ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून…

8 तास ago

जेवण केल्यावर लगेच टॉयलेटला जावं लागतं का? वाचा ‘हे’ नॉर्मल की एखाद्या आजाराचा संकेत

सकाळी टॉयलेटला जाऊन पोट साफ करणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी ही…

10 तास ago