मुख्य बातम्या

पवार साहेबांनी आमदार तसेच मंत्रीपद देऊनही संघर्षाच्या काळात त्यांनी साहेबांना सोडल; देवदत्त निकम

शिरुर (तेजस फडके) भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या सर्व साधारण सभेत शेतकऱ्यांची बाजु मांडण्यासाठी मी व्यासपीठावर जात असताना रांजणगाव MIDC तील गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आणुन माझ्या अंगावर सोडण्यात आले. तसेच मला व्यासपीठावर जाण्यासाठी रोखण्यात आले आणि खाली ढकलण्यात आले हा माझा अपमान नसुन सर्व शेतकऱ्यांचा अपमान असल्याची टिका देवदत्त निकम यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचें आंबेगाव-शिरुर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार देवदत्त निकम यांनी आज (दि २३) रोजी पाबळ-धामारी गणातील धामारी, खैरेनगर, जातेगाव बुद्रुक, जातेगाव खुर्द, हिवरे,खैरेवाडी, पाबळ या गावांचा दौरा केला. त्यावेळेस खैरेवाडी येथे ते बोलत होते. खैरेवाडी ग्रामस्थांनी मोठया उत्साहात ‘आमदार’ मजकुर टाकत फुलांच्या पायघड्या घालुन देवदत्त निकम यांचं स्वागत केलं. यावेळी मोठया प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना निकम म्हणाले, सध्याच्या महायुती सरकारने कष्टकरी आणि शेतकऱ्यांची वाट लावली असुन दुधाला कमीत कमी ३५ अन कांद्याला प्रति दहा किलो कमीत कमी २०० रुपये बाजारभाव मिळाला तरच शेतकऱ्यांच्या हातात पैसे राहतात. परंतु सरकारने लाडक्या बहिणीला महिन्याला १५०० रुपये दिले. परंतु तेलाच्या डब्याची किंमत मात्र २००० रुपये केली. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार नाही.

 

माझ्या समोर तुल्यबळ उमेदवार आहे. त्यांना पवार साहेबांनी आमदार केलं. अनेक वर्षे मंत्रीपद दिल. परंतु वाईट काळात ते साहेबांना सोडुन गेले. परंतु आम्ही मात्र स्वाभिमान जपत पवार साहेबांच्या पाठीमागे उभे राहिलो. त्यामुळे आता ते तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवतील. पण त्यांनी आजपर्यंत जे पण काही कमवलं आहे. ते पवार साहेबांमुळेच कमवलं आहे. त्यामुळे तुम्ही जे पण काही येईल ते घ्या. पण मतदान करताना मात्र त्यांनी ऐन संघर्षाच्या काळात पवार साहेबांची सोडलेली साथ विसरु नका आणि त्यांना त्यांची योग्य जागा दाखवा असेही निकम म्हणाले.

शिरुर-हवेली मधुन महाविकास आघाडीच्या वतीने अ‍ॅड अशोक पवार उद्या भरणार उमेदवारी अर्ज

शिरुरच्या पुर्व भागात मुजोर वाळु माफियांचा हौदोस; गुनाट येथील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

शिरुर-आंबेगाव मतदार संघातील बारा गावच्या पाणीप्रश्नामुळे वळसे पाटलांवर शेतकरी नाराज…?

शिरुर-आंबेगावच्या ‘वाल्या’ चा वाल्मिकी जयंतीच्या दिवशीच देवदत्त निकम यांनी घेतला खरपूस समाचार

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

11 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

11 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

11 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

13 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

1 दिवस ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

1 दिवस ago