शिरुर (तेजस फडके) भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या सर्व साधारण सभेत शेतकऱ्यांची बाजु मांडण्यासाठी मी व्यासपीठावर जात असताना रांजणगाव MIDC तील गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आणुन माझ्या अंगावर सोडण्यात आले. तसेच मला व्यासपीठावर जाण्यासाठी रोखण्यात आले आणि खाली ढकलण्यात आले हा माझा अपमान नसुन सर्व शेतकऱ्यांचा अपमान असल्याची टिका देवदत्त निकम यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचें आंबेगाव-शिरुर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार देवदत्त निकम यांनी आज (दि २३) रोजी पाबळ-धामारी गणातील धामारी, खैरेनगर, जातेगाव बुद्रुक, जातेगाव खुर्द, हिवरे,खैरेवाडी, पाबळ या गावांचा दौरा केला. त्यावेळेस खैरेवाडी येथे ते बोलत होते. खैरेवाडी ग्रामस्थांनी मोठया उत्साहात ‘आमदार’ मजकुर टाकत फुलांच्या पायघड्या घालुन देवदत्त निकम यांचं स्वागत केलं. यावेळी मोठया प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना निकम म्हणाले, सध्याच्या महायुती सरकारने कष्टकरी आणि शेतकऱ्यांची वाट लावली असुन दुधाला कमीत कमी ३५ अन कांद्याला प्रति दहा किलो कमीत कमी २०० रुपये बाजारभाव मिळाला तरच शेतकऱ्यांच्या हातात पैसे राहतात. परंतु सरकारने लाडक्या बहिणीला महिन्याला १५०० रुपये दिले. परंतु तेलाच्या डब्याची किंमत मात्र २००० रुपये केली. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार नाही.
माझ्या समोर तुल्यबळ उमेदवार आहे. त्यांना पवार साहेबांनी आमदार केलं. अनेक वर्षे मंत्रीपद दिल. परंतु वाईट काळात ते साहेबांना सोडुन गेले. परंतु आम्ही मात्र स्वाभिमान जपत पवार साहेबांच्या पाठीमागे उभे राहिलो. त्यामुळे आता ते तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवतील. पण त्यांनी आजपर्यंत जे पण काही कमवलं आहे. ते पवार साहेबांमुळेच कमवलं आहे. त्यामुळे तुम्ही जे पण काही येईल ते घ्या. पण मतदान करताना मात्र त्यांनी ऐन संघर्षाच्या काळात पवार साहेबांची सोडलेली साथ विसरु नका आणि त्यांना त्यांची योग्य जागा दाखवा असेही निकम म्हणाले.
शिरुर-हवेली मधुन महाविकास आघाडीच्या वतीने अॅड अशोक पवार उद्या भरणार उमेदवारी अर्ज
शिरुरच्या पुर्व भागात मुजोर वाळु माफियांचा हौदोस; गुनाट येथील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
शिरुर-आंबेगाव मतदार संघातील बारा गावच्या पाणीप्रश्नामुळे वळसे पाटलांवर शेतकरी नाराज…?
शिरुर-आंबेगावच्या ‘वाल्या’ चा वाल्मिकी जयंतीच्या दिवशीच देवदत्त निकम यांनी घेतला खरपूस समाचार
नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…
दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील…
चंदगड: नागरदळे (ता. चंदगड) येथे मीरा-भाईंदर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलिस शिपाई दयानंद कृष्णा पाटील (वय…
मुंबई: महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (MSFDA) यांच्या वतीने राज्यातील एकल पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना सहाय्य,…
राजगुरूनगर: राजगुरुनगर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, मावा, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम…
मुंबई: मुंबई उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरातील डोंगराळ भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात घडणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे…