मुख्य बातम्या

शिरूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य

नागरिक त्रस्त, सामाजिक कार्यकर्त्यांचा उपोषणाचा इशारा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, शिरूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिक आणि वाहनचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिरूर–तर्डोबाची वाडी–गोलेगाव–निमोणे–गुनाट–निर्वी, शिंदोडी तसेच शिरूर–रामलिंग–आण्णापूर या मार्गांवर असंख्य खड्डे पडल्याने रस्त्यांचे अक्षरशः “खड्ड्यांचे साम्राज्य” निर्माण झाले आहे.

वाहनधारकांना दररोज या खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागत असून, अपघातांचे प्रमाण देखील वाढत आहे. पावसाळा संपला असला तरी या खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अजूनही दुर्लक्ष करत आहेत. “खड्डे भरण्यासाठी आलेला निधी नक्की जातो कुठे?” असा थेट सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अनिल जाधव यांना वारंवार तोंडी आणि लेखी स्वरूपात खड्डे भरण्याबाबत कळविण्यात आले. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढला असून, “ताबडतोब खड्डे न भरल्यास आम्ही उपोषण करू,” असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

यावर अधिक चीड निर्माण करणारी बाब म्हणजे, सहाय्यक अभियंता जाधव हे वारंवार गैरहजर राहतात, अशी स्थानिकांची तक्रार आहे. कार्यालयात गेले की “साहेब पुण्याला मिटिंगला गेले आहेत” असे उत्तर कर्मचाऱ्यांकडून दिले जाते. त्यामुळे नागरिकांमध्ये “सहाय्यक अभियंता कार्यालयात दाखवा आणि बक्षीस मिळवा!” अशी उपहासात्मक टिप्पणी होत आहे.

या सर्व परिस्थितीमुळे शिरूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक नागरिकांनी शासनाने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. रस्त्यांवरील खड्डे तात्काळ भरावेत, अन्यथा आंदोलन आणि उपोषणाची लढाई उभारली जाईल, असा इशाराही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…

4 मिनिटे ago

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…

8 मिनिटे ago

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…

13 मिनिटे ago

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…

17 मिनिटे ago

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

11 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

11 तास ago