मुख्य बातम्या

रामलिंग ग्रुप ग्रामपंचायतीच्या बाबुरावनगरात नागरिक त्रस्त; चेंबर चोक, रस्त्यांची दुर्दशा

शिरूर (अरुणकुमार मोटे): रामलिंग ग्रामीण ग्रामपंचायत हद्दीतील बाबुरावनगर या मोण्या उपनगरामध्ये गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना मूलभूत समस्यांचा सामना करावा लागत आहे. बाबुरावनगरचा विकास ठप्प झाला असून नागरिक मात्र संतप्त झाले आहे.

रस्त्यावरील चेंबर चोक झाल्यामुळे संपूर्ण परिसरातील ड्रेनेज व्यवस्थाच कोलमडली असून, दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे नागरिकांचे हाल होत आहेत.स्थानिक रहिवासी उद्धव जाधव यांनी सांगितले की, “आमच्या बिल्डिंगजवळील चेंबर चोक झाल्यामुळे आमच्या संकुलातील चेंबरही अडले आहेत. दोन दिवसांपासून ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करत आहोत. मात्र, प्रशासनाकडून फक्त आश्वासनांची खैरात चालू आहे. प्रत्यक्ष काम मात्र सुरू झालेले नाही.”

लोकनेते आमदार स्व. बाबुराव पाचर्णे यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या या बाबुरावनगरमध्ये त्यांच्या हयातीत अडीच कोटींची पाणीपुरवठा योजना, सिमेंट रस्ते आणि नवीन भुयारी गटार योजना अशा अनेक मूलभूत सुविधा उभारण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांच्या निधनानंतर या बाबुरावनगरची अवस्था सुविधेवाचून दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.

बाबुरावनगरमधून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल ग्रामपंचायतीला मिळत असतानाही, रस्ते, ड्रेनेज आणि कचरा व्यवस्थापन या तिन्ही बाबतीत दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट दिसते. अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली असून, तात्पुरत्या दुरुस्तीसाठी मुरूम टाकण्याची आवश्यकता असताना तेही होत नाही.

ड्रेनेज तुंबल्यावर नागरिकांकडून सतत फोन व तक्रारी करूनही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून केवळ मौखिक आश्वासन मिळते. काही नागरिकांकडून रस्त्याच्या कडेला व मोकळ्या जागांमध्ये बिनधास्तपणे कचरा टाकला जात असून, यावर कोणतेही नियंत्रण ठेवले जात नाही. रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन कचरा फेकला जातो; त्यामुळे नागरिकांनी त्या ठिकाणी दिव्यांची व्यवस्था करावी अशी मागणी केली असतानाही प्रशासनाकडून कोणतीही कृती झालेली नाही.ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. “आता आम्ही केवळ ग्रामपंचायतीचे डोळे उघडण्याची वाट पाहत आहोत,” असे रहिवाश्यांचे म्हणणे आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जनतेच्या विश्वासाचा बुलंद कौल; विकासाच्या राजकारणावर एकनाथ शिंदेंची मजबूत छाप

मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा…

7 तास ago

वडगाव रासाई येथे पाटबंधारे विभागाचा कालवा फोडला; अनधिकृत सायपनद्वारे पाणी वळवल्याचा आरोप

सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा शिरुर…

7 तास ago

शालार्थ घोटाळ्यात मोठे रॅकेट उघड; शिक्षकांकडून 20 लाख, पगारातील अर्धी रक्कमही वसूल

बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी:…

1 दिवस ago

दुधातील भेसळ कशी ओळखाल? तुकाराम मुंढेंचा नागरिकांना महत्त्वाचा सल्ला

मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध…

1 दिवस ago

भारत-यूके मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रासाठी जागतिक बाजारपेठेची दारे खुली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने…

1 दिवस ago

₹2.93 कोटींच्या संशयित खाद्यतेलावर FDA चा छापा; छ. संभाजीनगरातील 2 कंपन्यांचे परवाने निलंबित

छत्रपती संभाजीनगर : 'सेफ फूड – सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन (FDA) ने…

1 दिवस ago