शिरूर (अरुणकुमार मोटे): रामलिंग ग्रामीण ग्रामपंचायत हद्दीतील बाबुरावनगर या मोण्या उपनगरामध्ये गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना मूलभूत समस्यांचा सामना करावा लागत आहे. बाबुरावनगरचा विकास ठप्प झाला असून नागरिक मात्र संतप्त झाले आहे.
रस्त्यावरील चेंबर चोक झाल्यामुळे संपूर्ण परिसरातील ड्रेनेज व्यवस्थाच कोलमडली असून, दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे नागरिकांचे हाल होत आहेत.स्थानिक रहिवासी उद्धव जाधव यांनी सांगितले की, “आमच्या बिल्डिंगजवळील चेंबर चोक झाल्यामुळे आमच्या संकुलातील चेंबरही अडले आहेत. दोन दिवसांपासून ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करत आहोत. मात्र, प्रशासनाकडून फक्त आश्वासनांची खैरात चालू आहे. प्रत्यक्ष काम मात्र सुरू झालेले नाही.”
लोकनेते आमदार स्व. बाबुराव पाचर्णे यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या या बाबुरावनगरमध्ये त्यांच्या हयातीत अडीच कोटींची पाणीपुरवठा योजना, सिमेंट रस्ते आणि नवीन भुयारी गटार योजना अशा अनेक मूलभूत सुविधा उभारण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांच्या निधनानंतर या बाबुरावनगरची अवस्था सुविधेवाचून दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.
बाबुरावनगरमधून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल ग्रामपंचायतीला मिळत असतानाही, रस्ते, ड्रेनेज आणि कचरा व्यवस्थापन या तिन्ही बाबतीत दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट दिसते. अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली असून, तात्पुरत्या दुरुस्तीसाठी मुरूम टाकण्याची आवश्यकता असताना तेही होत नाही.
ड्रेनेज तुंबल्यावर नागरिकांकडून सतत फोन व तक्रारी करूनही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून केवळ मौखिक आश्वासन मिळते. काही नागरिकांकडून रस्त्याच्या कडेला व मोकळ्या जागांमध्ये बिनधास्तपणे कचरा टाकला जात असून, यावर कोणतेही नियंत्रण ठेवले जात नाही. रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन कचरा फेकला जातो; त्यामुळे नागरिकांनी त्या ठिकाणी दिव्यांची व्यवस्था करावी अशी मागणी केली असतानाही प्रशासनाकडून कोणतीही कृती झालेली नाही.ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. “आता आम्ही केवळ ग्रामपंचायतीचे डोळे उघडण्याची वाट पाहत आहोत,” असे रहिवाश्यांचे म्हणणे आहे.
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…