मुख्य बातम्या

रांजणगाव पोलिसांचा बेशिस्त वाहनचालकांना दणका अवघ्या ९ महिन्यात ८४ लाखांचा दंड वसूल

रांजणगाव गणपती (तेजस फडके): वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या वाहतूक विभागानं मोठा दणका दिला आहे. बेशिस्त वाहनचालकांकडून अवघ्या नऊ महिन्यात पोलिसांनी तब्बल ८४ लाखांचा दंड वसूल केला आहे. रांजणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी ही माहिती दिली.

वाहन चालकांच्या स्वयंशिस्तीच्या अभावामुळे दिवसेंदिवस वाहन चालकांकडून मोठ्या प्रमाणात वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या वाहतूक विभागाच्या वतीने जानेवारी 2022 ते सप्टेंबर 2022 या काळात वाहतुकीचे नियमांची ऐशीतैशी करणाऱ्या तब्बल 13 हजार वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारत त्यांच्याकडून सुमारे 84 लाखांचा दंड वसूल केला असुन ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक नो पार्किंगच्या एक हजार वाहनांवर कारवाई करत या एकाच महिन्यात 5 लाख 61 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

याशिवाय रांजणगाव एमआयडीसी मधील अंतर्गत रस्त्यावर व पुणे – अहमदनगर रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांच्या जिवितास धोका होईल, रहदारीस अडथळा होईल अशा रीतीने वाहन पार्क करणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे अशा प्रकारचे अपराध करणा-या एकुन 110 वाहन चालकांवरही गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.

तसेच अनेक वाहन चालकांना समज देऊन सोडण्यात येते तरीही वाहन चालक बेशिस्तपणे वाहन चालवित आहेत. अशा बेशिस्त वाहन चालक, मालकांवरील कारवाई अधिक कठोर करण्याचा विचार वाहतूक पोलिस करीत असुन सातत्याने वाहतूक नियम भंग केल्यास अशा वाहन मालकाचा परवाना उपप्रादेशिक विभागाकडून काही महिन्यांसाठी निलंबित करता येतो. या नियमांचाही भविष्यात अवलंब करणार आहोत, असे सहायक फौजदार मारुती पासलकर यांनी सांगितले. रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढील काळातही या बेशिस्त वाहन चालकांवरील कारवाई अशीच चालू राहणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार सुरज वळेकर आणि पोलिस हवालदार संतोष पवार यांनी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली; आम्ही ती वेगाने कनेक्ट केली; एकनाथ शिंदे

रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…

8 तास ago

पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा सत्ताधा-यांचा डाव; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…

8 तास ago

१०७ हुतात्म्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कुठे? कामगार, भाषा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…

10 तास ago

पत्नी खून प्रकरणात दत्तात्रय गायकवाड निर्दोष; परिस्थितीजन्य पुरावे ठरले अपुरे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…

10 तास ago

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

1 दिवस ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

1 दिवस ago