मुख्य बातम्या

रांजणगाव पोलिसांनी त्या “पाच” जणांचा बळी घेणाऱ्या कंटेनर चालकास ठोकल्या बेड्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे-नगर महामार्गावर एल जी कंपनीसमोर असणाऱ्या हॉटेल एस नाईन हॉटेल जवळ बुधवार (दि १७) रोजी मध्यरात्री १:३० च्या सुमारास अहमदनगरकडुन-पुण्याकडे चारचाकी इको गाडीला रांजणगावकडुन कारेगावकडे विरुद्ध दिशेने आलेल्या कंटेंनरची धडक बसुन झालेल्या गंभीर अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. हा अपघात झाल्यानंतर कंटेंनर चालक पळुन गेला होता. परंतु रांजणगाव MIDC पोलिसांनी त्याला हरियाणा राज्यात जाऊन अटक केली आहे.

दि १७ ऑगस्ट रोजी रात्री १:३० च्या सुमारास पुणे-नगर रस्त्यावर रांजणगावच्या बाजूने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेंनरने पुण्याकडे जाणाऱ्या इको गाडीला धडक दिली. त्यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर कंटेंनर चालक पळून गेला होता. तसेच त्याचा मोबाइल गाडीतच राहिल्याने रांजणगाव MIDC पोलिसांना आरोपी शोधण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे पोलिसांनी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मदतीने तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेत कंटेंनर चालक उमर सुवेदिन मोहमद (वय 34) रा. खलनाका, ता. हथिन, जि. पळवल राज्य हरियाणा याला ताब्यात घेऊन आज (दि २२) रोजी शिरुर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुरचे PI विनोद पाटील यांच्यासाह डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई

तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त  शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा…

7 तास ago

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

14 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

14 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

14 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

14 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

14 तास ago