शिरूर (अरुणकुमार मोटे): राज्य शासनाच्या “१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात” राज्यातील सर्व ३५८ तालुक्यांतील सुमारे १०,००० शासकीय कार्यालयांनी सहभाग घेतला. या उपक्रमाचे उद्दिष्ट होते शासकीय कार्यालयातील कार्यप्रणालीत पारदर्शकता, वेगवान सेवा वितरण, नागरिकाभिमुख दृष्टिकोन व नवोपक्रमांची अंमलबजावणी साधणे.
या कार्यक्रमाअंतर्गत शासनाने सर्व शासकीय विभागांच्या प्रत्येक महसुली विभागातील उत्कृष्ट तीन तालुका कार्यालयांची निवड केली. पुणे विभागातील एकूण २५ प्रशासकीय विभागांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. यामध्ये भूमिअभिलेख विभागाने विशेष उत्साहाने व गुणवत्तेने सहभाग नोंदवत उल्लेखनीय कामगिरी बजावली.या कार्यामध्ये शिरूर तालुक्याच्या भूमिअभिलेख कार्यालयाने आपल्या ६५ स्पर्धक कार्यालयांमधून तृतीय क्रमांक मिळवत एक मानाचा मुजरा पटकावला आहे.
ही यशस्वी कामगिरी मिळवण्यासाठी शिरूर कार्यालयाने नागरिकांसाठी सेवा सुलभतेवर भर देत, डिजिटायझेशन, वेळेवर नोंद व नकाशा वितरण, स्वच्छता व कार्यसंस्कृती यामध्ये विशेष सुधारणा केल्या. या सर्व प्रयत्नांमुळे नागरिकांचा विश्वास जिंकत कार्यालयाने उल्लेखनीय प्रगती साधली आहे.”ही संपूर्ण शिरूर भूमी अभिलेखच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांची फलश्रुती आहे. त्यांच्या अथक मेहनतीला आणि सेवाभावी दृष्टिकोनाला सलाम,” असे मत उप अधीक्षक अमोल भोसले यांनी व्यक्त केले आहे.
तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा…
पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…
सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…
बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…
सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…