मुख्य बातम्या

शिरूर भूमिअभिलेख कार्यालयाची उल्लेखनीय कामगिरी, विभागात तृतीय क्रमांक

शिरूर (अरुणकुमार मोटे): राज्य शासनाच्या “१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात” राज्यातील सर्व ३५८ तालुक्यांतील सुमारे १०,००० शासकीय कार्यालयांनी सहभाग घेतला. या उपक्रमाचे उद्दिष्ट होते शासकीय कार्यालयातील कार्यप्रणालीत पारदर्शकता, वेगवान सेवा वितरण, नागरिकाभिमुख दृष्टिकोन व नवोपक्रमांची अंमलबजावणी साधणे.

या कार्यक्रमाअंतर्गत शासनाने सर्व शासकीय विभागांच्या प्रत्येक महसुली विभागातील उत्कृष्ट तीन तालुका कार्यालयांची निवड केली. पुणे विभागातील एकूण २५ प्रशासकीय विभागांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. यामध्ये भूमिअभिलेख विभागाने विशेष उत्साहाने व गुणवत्तेने सहभाग नोंदवत उल्लेखनीय कामगिरी बजावली.या कार्यामध्ये शिरूर तालुक्याच्या भूमिअभिलेख कार्यालयाने आपल्या ६५ स्पर्धक कार्यालयांमधून तृतीय क्रमांक मिळवत एक मानाचा मुजरा पटकावला आहे.

ही यशस्वी कामगिरी मिळवण्यासाठी शिरूर कार्यालयाने नागरिकांसाठी सेवा सुलभतेवर भर देत, डिजिटायझेशन, वेळेवर नोंद व नकाशा वितरण, स्वच्छता व कार्यसंस्कृती यामध्ये विशेष सुधारणा केल्या. या सर्व प्रयत्नांमुळे नागरिकांचा विश्वास जिंकत कार्यालयाने उल्लेखनीय प्रगती साधली आहे.”ही संपूर्ण शिरूर भूमी अभिलेखच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांची फलश्रुती आहे. त्यांच्या अथक मेहनतीला आणि सेवाभावी दृष्टिकोनाला सलाम,” असे मत उप अधीक्षक अमोल भोसले यांनी व्यक्त केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व समर्पण आवश्यक; विद्यार्थ्यांनी ध्येयासाठी वेडे व्हावे : डॉ. चंद्रकांत पाटील

शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…

9 तास ago

Video; शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; बाबुरावनगरमध्ये सांडपाण्याचे साम्राज्य

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…

9 तास ago

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…

11 तास ago

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

1 दिवस ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

1 दिवस ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

1 दिवस ago