मुख्य बातम्या

शिक्रापूरातून गोमांसची वाहतूक करणारा टेम्पो जप्त

शिक्रापूर (शेरखान शेख) शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चार दिवसांपूर्वी गोमांस घेऊन जाणारी तीन वाहने गोरक्षक व पोलिसांनी जप्त केल्याची घटना ताजी असतानाच आता शिक्रापूर येथून दिड हजार किलो गोमांस घेऊन जाणारा टेंपो जप्त करण्यात गोरक्षक व शिक्रापूर पोलिसांना यश आले असून गोमांस वाहतूक करणाऱ्या सुपियन इद्रीस कुरेशी व अदनान पैरोज कुरेशी या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ranjangaon-mutadwar-darshan

शिक्रापूर येथील पुणे-नगर महामार्गावरून पुणे येथे गोमांस घेऊन एक टेम्पो जाणार असल्याची माहिती मानद पशुकल्यान अधिकारी शिवशंकर स्वामी यांना मिळाली त्यांनतर शिवशंकर स्वामी, पोलीस शिपाई पवन जाधव, गोरक्षक मनोज मिसर, अभिषेक कडुसकर, कृष्णा सातपुते, प्रकाश कदम, हर्षद पाखरे, गणेश शिंदे, रुपेश सपकाळ, सर्पमित्र शेरखान शेख, पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर, पोलीस नाईक रोहिदास पाखरे, भास्कर बुधवंत हे सर्वजण शिक्रापूर येथे थांबले असता. त्यांना एम एच १६ ए एच १३३७ हा आयशर टेम्पो आलेला दिसला. त्यावेळी उपस्थित गोरक्षक व पोलिसांनी वाहन चालकांना अडवून पाहणी केली असता. त्यामध्ये गाय, बैलांचे कापलेली मुंडके, पाय व इतर शरीर मिळून आले. दरम्यान त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदर चे गोमांस हे अहमदनगर जिल्ह्यातून पुणे येथे देण्यासाठी चाललो असल्याचे सांगितले, यावेळी पोलिसांनी सदर वाहन आणि तब्बल दिड हजार किलो गोमांस असा पाच लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत मानद पशुकल्यान अधिकारी शिवशंकर राजेंद्र स्वामी (वय २७) रा. आनंदनगर सिंहगड पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी गोमांस वाहतूक करणाऱ्या सुपियन इद्रीस कुरेशी (वय २५) आणि अदनान पैरोज कुरेशी (वय १९) दोघे रा. रा. झेंडी गेट जिल्हा परिषद शाळेजवळ अहमदनगर जि. अहमदनगर या दोघांवर गुन्हे दाखल करत दोघांना अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संतोष मारकड हे करत आहे.

प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष…
अहमदनगर जिल्ह्यात दररोज गोवंश कत्तल करण्याचे प्रकार घडत असताना प्रशासन दखल घेत नसल्याने दररोज हजारो किलो गोमांस विक्रीसाठी जात असल्याने प्रशासनाने यावर ठोस कारवाई करण्याची मागणी गोरक्षक करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

16 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

16 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

16 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

18 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

1 दिवस ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

1 दिवस ago