मुख्य बातम्या

Video; शेतात जायला रस्ताच नसल्याने पाच एकर द्राक्षबाग तोडण्याचा शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय

शिरुर (तेजस फडके) निजाम आणि इंग्रज काळापासुन अस्तित्वात असलेला ३३ फूट रुंदीचा दोन गावांना जोडणारा सार्वजनिक शिवरस्ता आज अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असुन त्याचा फटका थेट शेतकऱ्यांच्या उपजीविकेला बसू लागला आहे. या रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने शेतीच्या मालकी हक्काचा पुरेपूर उपयोग न करता आल्याने एका शेतकऱ्याने अखेर वैतागून आपली पाच एकर द्राक्ष बागा तोडून टाकण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे.

निमोणे येथील गट नंबर १०७७ आणि गुनाट येथील गट नंबर ४७० या दोन गटां दरम्यानचा ऐतिहासिक रस्ता सन १९९९ पासून स्थानिक भूमाफियांच्या अतिक्रमणामुळे बंद झाला आहे. महसूल विभागाने या रस्त्याची दोन वेळा फेरचौकशी केली असून, तीन तहसीलदारांनी रस्ता मोकळा करण्याचे आदेशही काढले आहेत. परंतु आजतागायत या आदेशाची कोणतीही अंमलबजावणी झाली नाही.

या संदर्भात दोन्ही गावांच्या ग्रामपंचायतींनीही ठराव करून रस्ता मुक्त करण्याची मागणी केली आहे. मात्र तरीही प्रशासनाचे दुर्लक्ष कायम आहे. परिणामी, या रस्त्याअभावी संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहोचणे अशक्यप्राय बनले आहे.

त्यामुळे शेतात पोहोचण्यासाठी पर्यायी आणि कायमस्वरुपी रस्ता उपलब्ध नसल्याने शेतीचे उत्पन्न तर बुडतेच आहे. शिवाय भविष्यातील नुकसानही टाळता येत नाही. त्यामुळे एका शेतकऱ्याने वैतागून पाच एकरची द्राक्ष बाग तोडून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

या प्रकरणी स्थानिक प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करुन अतिक्रमण हटवून रस्ता खुला करावा अशी मागणी शेतकरी नानासाहेब काळे यांनी केली आहे. अन्यथा या रस्त्याच्या प्रश्नावर लोकशाही मार्गाने लवकरच मोठे आंदोलन करणार असल्याचेही काळे यांनी सांगितले.

शिरुर मध्ये सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांच्यासह कार्यकर्त्यांचे सामुहिक मुंडण

शिरुर तालुक्यात शेतीच्या वादातुन तिघांना मारहाण; सात जणांविरोधात गुन्हा दाखल

शिरुर तालुक्यात निवडणुकीत पराभव झाल्याच्या रागातुन तलवारीने हल्ला; गुन्हा दाखल

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व समर्पण आवश्यक; विद्यार्थ्यांनी ध्येयासाठी वेडे व्हावे : डॉ. चंद्रकांत पाटील

शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…

10 तास ago

Video; शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; बाबुरावनगरमध्ये सांडपाण्याचे साम्राज्य

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…

10 तास ago

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…

12 तास ago

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

1 दिवस ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

1 दिवस ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

1 दिवस ago