शिरुर (तेजस फडके) निजाम आणि इंग्रज काळापासुन अस्तित्वात असलेला ३३ फूट रुंदीचा दोन गावांना जोडणारा सार्वजनिक शिवरस्ता आज अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असुन त्याचा फटका थेट शेतकऱ्यांच्या उपजीविकेला बसू लागला आहे. या रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने शेतीच्या मालकी हक्काचा पुरेपूर उपयोग न करता आल्याने एका शेतकऱ्याने अखेर वैतागून आपली पाच एकर द्राक्ष बागा तोडून टाकण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे.
निमोणे येथील गट नंबर १०७७ आणि गुनाट येथील गट नंबर ४७० या दोन गटां दरम्यानचा ऐतिहासिक रस्ता सन १९९९ पासून स्थानिक भूमाफियांच्या अतिक्रमणामुळे बंद झाला आहे. महसूल विभागाने या रस्त्याची दोन वेळा फेरचौकशी केली असून, तीन तहसीलदारांनी रस्ता मोकळा करण्याचे आदेशही काढले आहेत. परंतु आजतागायत या आदेशाची कोणतीही अंमलबजावणी झाली नाही.
या संदर्भात दोन्ही गावांच्या ग्रामपंचायतींनीही ठराव करून रस्ता मुक्त करण्याची मागणी केली आहे. मात्र तरीही प्रशासनाचे दुर्लक्ष कायम आहे. परिणामी, या रस्त्याअभावी संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहोचणे अशक्यप्राय बनले आहे.
त्यामुळे शेतात पोहोचण्यासाठी पर्यायी आणि कायमस्वरुपी रस्ता उपलब्ध नसल्याने शेतीचे उत्पन्न तर बुडतेच आहे. शिवाय भविष्यातील नुकसानही टाळता येत नाही. त्यामुळे एका शेतकऱ्याने वैतागून पाच एकरची द्राक्ष बाग तोडून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रकरणी स्थानिक प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करुन अतिक्रमण हटवून रस्ता खुला करावा अशी मागणी शेतकरी नानासाहेब काळे यांनी केली आहे. अन्यथा या रस्त्याच्या प्रश्नावर लोकशाही मार्गाने लवकरच मोठे आंदोलन करणार असल्याचेही काळे यांनी सांगितले.
शिरुर मध्ये सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांच्यासह कार्यकर्त्यांचे सामुहिक मुंडण
शिरुर तालुक्यात शेतीच्या वादातुन तिघांना मारहाण; सात जणांविरोधात गुन्हा दाखल
शिरुर तालुक्यात निवडणुकीत पराभव झाल्याच्या रागातुन तलवारीने हल्ला; गुन्हा दाखल
मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…
मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था…
पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी…
शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी…
पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे…
पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागते. कारण या ऋतूमध्ये अनेक आजार डोकं वर काढतात. चुकीच्या…