अपघात रोखण्यासाठी शिरूर पोलिसांची अभिनव पुढाकार
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून जाणारा पुणे–आहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग हा अत्यंत वर्दळीचा आणि वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग आहे. या महामार्गावर मौजे न्हावरा फाटा आणि सतरा कमान चौक हे अपघातप्रवण ठिकाणे असून, याठिकाणी वारंवार अपघात होत असल्याची नोंद आहे.
न्हावरा फाटा परिसरातून आहिल्यानगरकडून येणारी अवजड वाहतूक ही उतार असल्यामुळे जोरात येते. त्याच ठिकाणी चौक आणि रोड क्रॉसिंग एकत्र असल्याने वाहनचालकांना अंदाज न आल्याने अनेकदा धोकादायक परिस्थिती निर्माण होते. विशेषतः रात्रीच्या वेळी अंधारामुळे अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. तसेच सतरा कमान चौकातही पुणेकडून येणाऱ्या वाहनांचा वेग उतारामुळे वाढतो आणि चौकाचा अंदाज न आल्यामुळे तीव्र अपघात घडतात. या पार्श्वभूमीवर शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश कजळे यांनी स्वतः दोन्ही ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
अपघात रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी वाहनचालकांना रात्रीच्या वेळी योग्य सूचना मिळाव्यात यासाठी या ठिकाणी सौरऊर्जेवर चालणारे सिग्नल बसवण्याचा प्रस्ताव पुढे नेला. या उपक्रमात सामाजिक उत्तरदायित्व जपत, IFB कंपनी (मौजे करडे, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या एच.आर. हेड काशीराम मेस्री यांच्या माध्यमातून न्हावरा फाटा आणि सतरा कमान चौक या दोन्ही ठिकाणी एकूण चार सौरऊर्जेवर चालणारे सिग्नल आज बसवण्यात आले. या उपक्रमामुळे रात्रीच्या वेळी चौकाचा अंदाज घेणे वाहनचालकांसाठी सोपे होणार असून, अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होईल. शिरूर पोलिसांनी केलेल्या या सकारात्मक आणि उपयुक्त पावलामुळे नागरिकांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने हा एक अनुकरणीय आदर्श ठरणार आहे.
न्हावरे (ओमकार भोरडे) शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरुन संतापलेल्या एका 26 वर्षीय नातवाने आपल्या…
मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…
मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था…
पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी…
शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी…
पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे…