साडेतीन किलो गांजा जप्त..
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिसांनी दारूसाठ्याच्या कारवाईनंतर जांबुत येथून गांजा विक्री करणाऱ्या एका जणाला पकडले असून त्याच्याकडून साडेतीन किलो गांजा किंमत ३८ हजार ८४० रुपयांचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती शिरूर पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे. समिर हजरतअली शेख (वय ३० रा. जांबुत ता. शिरूर जि. पुणे) याला याबाबत अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी दि. ११ मार्च रोजी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलिस अंमलदार अंबादास थोरे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की जांबुत येथे समीर शेख हा त्याच्या घरात गांजाची विक्री करीत आहे. या माहितीप्रमाणे शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस पथकाने जांबुत ता. शिरूर जि.पुणे येथील आरोपी यांचे राहते घरी सापळा रचुन छापा टाकला असता त्या ठिकाणी समिर हजरतअली शेख (वय ३० वर्षे रा. जांबुत ता. शिरूर जि. पुणे )यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन ३ किलो ८४० ग्रॅम तयार वजनाचा गांजा असा एकुण ३८ हजार ८४० रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरोधात एन.डी.पी.एस. कायदा १९८५ चे कलम ८ (क), २०,२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दिपक करांडे, पोलिस हवालदार भागवत गरकळ, बाळु भवर, पोलिस अंमलदार अंबादास थोरे, भाऊसाहेब ठोसर यांचे पथकाने केली असुन सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शानाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक करांडे हे करीत आहे.
महारेलला जनजागृती, चर्चासत्रे आणि तीन आठवड्यांत पर्यायी मार्गाचा अभ्यास करण्याचे निर्देश ठाणे : ठाणे अंतर्गत…
सहा वर्षे आश्वासनांची मालिका, 'स्टॉप पेमेंट' धनादेशांचा धक्का; तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व संगनमताचे गंभीर…
'देवाभाऊ' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे…
मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून-जुलै 2026 या कालावधीत राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री,…
नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या 'मंडल यात्रा'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय…
ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल…