Shirur Police Station
शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशनचा पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी चार्ज घेताच शिरूर शहरातील रोड रोमिओ व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
पोलिस वाहतुक शाखेमार्फत वीस दिवसातच तब्बल ४ लाख ५१ हजारांचा दंड वसुल केला आहे. यात १७ बुलेटस्वारांवर सायलेन्सर (फटाके फोडणे) कारवाई केली असून १७ हजार रूपयांचा दंड वसुल केला आहे. तसेच ट्रिपल सीट असणाऱ्या ७६ वाहन चालकांवर कारवाई करून ७६ हजार यांचा दंड वसूल केला आहे. विना लायसन्स गाडी चालवणाऱ्या १६ जणांवर कारवाई करून ८० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. लायसन्स जवळ न बाळगणाऱ्या 186 जणांवर कारवाई करून १लाख ४९ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. शिरूर शहरात फोर व्हीलर गाडीला काळा काचा लावून फिरणाऱ्या २९ जणांवर कारवाई करून २९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच फॅन्सी नंबर वापरणाऱ्या ९७ जणांवर कारवाई करून ६२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. शिरूर शहरात नो पार्किंग मध्ये गाड्या पार्क केलेल्या १९० वाहनावर कारवाई करून तब्बल १ लाख ३८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी ‘पहिले जनसुनवाई मगच कारवाई’ अशी आपल्या कामाची पद्धत असल्याचे सांगितले. शिरुर शहरातील वाहतुकीचे प्रश्न, विनापरवाना वाहन चालविणे, ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह, रोडरोमिओ याबाबत प्रथम जनजागृतीवर आपला भर असल्याचे त्यांनी सांगितले. प्रबोधनातून सुधारणा न झाल्यास कठोर कारवाईचा दंडुका उगारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मुली, महिलांची छेडखानी करणाऱ्यांची नुसती माहिती मिळाली तरी दुसऱ्या मिनिटाला त्याच्यावर कारवाई झालेली असेल. छेडछाडीचे प्रकार कुठे घडत असतील तर फक्त पोलिसांपर्यंत माहिती कळवा, त्याचा बंदोबस्त झालेला दिसेल. शाळा महाविद्यालयांच्या परिसरात दामिनी पथक, निर्भया पथकाबरोबरच नव्याने छेडछाडविरोधी पथक कार्यान्वित करीत असल्याचे केंजळे यांनी सांगितले.
दरम्यान, शिरूर शहरातली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असून, यापुढेही अशीच धडक कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले आहे.
शिरूर शहरामध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सलग दुसऱ्या दिवशी कारवाई…
शिरूर पोलिसांकडून रोडरोमिओ व बेशिस्त वाहन चालकांवर कडक कारवाई…
शिरुर; कोर्टातली केस मागे घे म्हणतं तडीपार गुंडाची भावकीतील एकाला लोखंडी रॉडने जबर मारहाण…
शिरूर शहरात कत्तल केलेल्या चार गोमांस विक्री दुकानांवर पोलिसांची कारवाई…
पुणे-अहमदनगर रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू…
शिरूरमध्ये तुला लय माज आला आहे काय? असे म्हणाला अन्…
शिरूर तालुक्यात कंपनीच्या मॅनेजरने केला महिलेचा विनयभंग…
मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…
मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था…
पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी…
शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी…
पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे…
पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागते. कारण या ऋतूमध्ये अनेक आजार डोकं वर काढतात. चुकीच्या…