waghale-sugarcane
वाघाळेः वाघाळे (ता. शिरूर) येथे सोमवारी (ता. २३) सायंकाळी सहाचे सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसाने ऊस, मका, कडवळ ही पिके अक्षरशः भुईसपाट झाली आहेत.
वाघाळे आणि परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. सततच्या पावसाने कांद्याची रोपे खराब झाली होती. उरलेल्या रोपत शेतकऱ्यांनी कशीबशी कांदा लागवड केली होती. पण रात्री पावसाचा जोर इतका होता की शेतांना अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले होते. कांद्यात सकाळी दहा वाजेपर्यंत पाणी साचले होते. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, अशी माहिती माजी चेअरमन सूर्यकांत बढे यांनी दिली.
वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने ताबडतोब पहाणी करून पंचनामे करावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दयावी अशी मागणी दादासाहेब सोनवणे उपसरपंच, माजी चेअरमन दिलीप थोरात, एकनाथ डफळ, नितीन भोसले, राजू माकर, बाळासाहेब थोरात, अंकुश शेळके, योगेश डफळ दत्तात्रय थोरात आदी शेतकऱ्यांनी केली आहे.
वाघाळे येथे 24 वर्षानंतर माजी विद्यार्थी आले एकत्र!
Video: वाघाळे येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात साजरी!
वाघाळे विविध विकास सोसायटी कडून सभासदांना दहा टक्के लाभांश!
कालिकामाता विद्यालय वाघाळे येथील विद्यार्थी तब्बल ३१ वर्षांनी आले एकत्र!
रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…
मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…
महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…