rupali khandale
शिक्रापूरः जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे पतीने पत्नीशी वारंवार होणाऱ्या वादातून पत्नीला मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे. यामध्ये रुपाली सचिन खंडाळे या महिलेचा मृत्यू झाला आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे सचिन दत्तात्रय खंडाळे याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील सचिन खंडाळे व रुपाली खंडाळे या दांपत्यामध्ये सचिन दारू पीत असल्याने वाद होत होते. मंगळवारी (ता. २) सचिन याच्या आजोबांच्या वर्षश्राद्धचा कार्यक्रम होता. मात्र, सचिन त्या कार्यक्रमाला न थांबता रानातील पोल्ट्रीवर थांबला होता. त्याने पत्नी रुपाली हिला देखील तेथे बोलावून घेतले होते. रात्री उशिरा रुपाली पती सचिनकडे पोल्ट्रीवर गेली असता त्यांच्या मध्ये वाद झाले. आज पहाटेच्या सुमारास रुपाली हिला शिक्रापूर येथील सूर्या हॉस्पिटल येथे आणले असता तिच्या डोक्यात तसेच गळ्यावर काही जखमा होत्या तर रुपाली हि मयत झालेली होती.
याबाबत रुपालीच्या नातेवाईकांनी सचिन यास विचारपूस केली असता त्याने रात्री आमच्यात वाद झाल्याने मी रुपाली हिला मारले असल्याचे सांगितले. नातेवाईकांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. सदर घटनेमध्ये रुपाली सचिन खंडाळे (वय ३४ वर्षे रा. जातेगाव खुर्द ता. शिरुर जि. पुणे) यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत रुपालीचा भाऊ ललित दत्तात्रय गावडे (वय २६ वर्षे रा. गणेगाव खालसा ता. शिरुर जि. पुणे) याने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहेत. शिक्रापूर पोलिसांनी सचिन दत्तात्रय खंडाळे (रा. जातेगाव खुर्द ता. शिरुर जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलिस करत आहेत.
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…