मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यातील तलाठी, मंडल आधिकाऱ्यांकडून आर्थिक मलईसाठी नोंदी करण्यासाठी होतेय टाळाटाळ…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील तलाठी, मंडल आधिकाऱ्यांकडून आर्थिक मलईसाठी नोंदी करण्यासाठी टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.

शिरूर तालुका सधन तालुका म्हणून ओळखला जातो. पुणे-नगर हायवेलगत असणाऱ्या गावांमध्ये व तालुक्यात जमिन खरेदी-विक्री व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत असतात. परंतु, त्या नोंदी करण्यासाठी तलाठी व मंडल आधिकारी आर्थिक मलईसाठी जाणीवपुर्वक टाळाटाळ करत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेकडो नोंदी रखडल्या आहेत. सगळी प्रक्रिया ऑनलाईन असून पैसे मिळाल्याशिवाय नोंदी टाकल्या जात नाही. ही अतिशय गंभीर बाब असून रखडलेल्या नोंदीची तातडीने चौकशी करून दोषी असणाऱ्या तलाठी व मंडल आधिकारी यांच्यावर जिल्हाधिकारी, प्रांत आधिकारी यांनी कारवाई करणे गरजेचे आहे.

शिरूर तालुक्यात बऱ्याच वर्षा पासून ठाण मांडून बसलेले काही मग्रुर तलाठी, मंडल आधिकारी चांगलेच गब्बर बनले असून ते वरीष्ठांचेही ऐकत नसल्याचे चित्र समोर येत आहे. तलाठी, मंडल अधिकारी कार्यालयात अनेक ठिकाणी ‘झिरो’ कार्यरत असून त्यांच्या मार्फत जोरदार वसुली होत आहे. वेळेत नोंदी न टाकणाऱ्या तलाठी व मंडल आधिकाऱ्यांवर आता वरीष्ठ अधिकारी काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरेल. आता नवनिर्वाचित आमदार यांनीही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पैसे दिल्याशिवाय नोंदच होत नाही. तसेच काहीतरी थातूरमातूर कारण दाखवून नोंद रद्द करण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. याला आळा न बसल्यास तहसिल कार्यालयासमोर याबाबत आंदोलन करण्याचा इशारा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
(क्रमश:)

Video: महसूल प्रशासन निवडणुकीत व्यस्त, वाळू माफिया चोरतात वाळू मस्त…

शिरुर तालुक्यात मारहाण करुन जबरी दरोडा; सोन्याच्या झुब्यासाठी महिलेचे कान कापले

जनता दल प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

पुणे-नगर महामार्गावर युवती किंवा महिलांना लिफ्ट देताय…? सावधान…

शिरुर-हवेली मतदारसंघात माऊली कटके यांचा दणदणीत विजय…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

5 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

5 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

5 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

5 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

10 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

10 तास ago