शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील तलाठी, मंडल आधिकाऱ्यांकडून आर्थिक मलईसाठी नोंदी करण्यासाठी टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.
शिरूर तालुका सधन तालुका म्हणून ओळखला जातो. पुणे-नगर हायवेलगत असणाऱ्या गावांमध्ये व तालुक्यात जमिन खरेदी-विक्री व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत असतात. परंतु, त्या नोंदी करण्यासाठी तलाठी व मंडल आधिकारी आर्थिक मलईसाठी जाणीवपुर्वक टाळाटाळ करत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेकडो नोंदी रखडल्या आहेत. सगळी प्रक्रिया ऑनलाईन असून पैसे मिळाल्याशिवाय नोंदी टाकल्या जात नाही. ही अतिशय गंभीर बाब असून रखडलेल्या नोंदीची तातडीने चौकशी करून दोषी असणाऱ्या तलाठी व मंडल आधिकारी यांच्यावर जिल्हाधिकारी, प्रांत आधिकारी यांनी कारवाई करणे गरजेचे आहे.
शिरूर तालुक्यात बऱ्याच वर्षा पासून ठाण मांडून बसलेले काही मग्रुर तलाठी, मंडल आधिकारी चांगलेच गब्बर बनले असून ते वरीष्ठांचेही ऐकत नसल्याचे चित्र समोर येत आहे. तलाठी, मंडल अधिकारी कार्यालयात अनेक ठिकाणी ‘झिरो’ कार्यरत असून त्यांच्या मार्फत जोरदार वसुली होत आहे. वेळेत नोंदी न टाकणाऱ्या तलाठी व मंडल आधिकाऱ्यांवर आता वरीष्ठ अधिकारी काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरेल. आता नवनिर्वाचित आमदार यांनीही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पैसे दिल्याशिवाय नोंदच होत नाही. तसेच काहीतरी थातूरमातूर कारण दाखवून नोंद रद्द करण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. याला आळा न बसल्यास तहसिल कार्यालयासमोर याबाबत आंदोलन करण्याचा इशारा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
(क्रमश:)
Video: महसूल प्रशासन निवडणुकीत व्यस्त, वाळू माफिया चोरतात वाळू मस्त…
शिरुर तालुक्यात मारहाण करुन जबरी दरोडा; सोन्याच्या झुब्यासाठी महिलेचे कान कापले
जनता दल प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट
पुणे-नगर महामार्गावर युवती किंवा महिलांना लिफ्ट देताय…? सावधान…
मुंबई: देशातील प्रतिष्ठित पत्रकार संघटनांपैकी एक असलेल्या Mumbai Press Club ने आपल्या तीन सदस्यांची हकालपट्टी…
मुंबई: राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम, परिणामकारक आणि पर्यटकाभिमुख करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे, सेवांचा…
सोशल मीडियातून मैत्री करून लॉजवर नेऊन अत्याचार; अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप, १५ हून अधिक…
मुंबई: राज्यातील कामगार क्षेत्रातील कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण…
मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथून कुटुंबासह मुंबईत पर्यटनासाठी आलेली ८ वर्षीय अनाबिया सुलतान मुस्ताक शेख ही…
मुंबई: गोरेगावमधील पत्रा चाळ रहिवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात…