मुख्य बातम्या

अँजिओप्लास्टी झालेल्या शिक्षकांना बदलीत सवलत नसतानाही नियमबाह्यरिता दिला विशेष लाभ

शिरूर (अरुणकुमार मोटे): राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत यंदा ‘हृदयाचा’ मुद्दा तापला आहे. अँजिओप्लास्टी झालेल्या शिक्षकांना बदलीत सवलत न देण्याचा नियम असतानाही पुणे जिल्हा परिषदेसह अनेक जिल्हा परिषदांनी तो नियम पायदळी तुडवला आहे . यामुळे संवर्ग ४ मधील शिक्षकांचे मन सुन्न झाले असून, संपूर्ण बदली प्रक्रिया नियमाप्रमाणे पुन्हा राबवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे

ग्रामीण विकास विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट शब्दांत नमूद आहे की, “बायपास, ओपन हार्ट, इम्प्लांट यांसारख्या गंभीर हृदयशस्त्रक्रियांना सवलत; अँजिओप्लास्टीला नाही!”यामागे न्यायालयीन निकालाचा आधार घेण्यात आला आहे, ज्यात अँजिओप्लास्टीला शस्त्रक्रियेच्या प्रकारात न धरल्याचे म्हटले आहे. तरीही, अनेक जिल्हा परिषदांनी बदली प्रक्रियेत या शिक्षकांना ‘विशेष लाभ’ दिला, हे उघड झाले आहे.

अँजिओप्लास्टी झालेल्या शिक्षकांच्या भावना मात्र उफाळून आल्या आहेत. “हृदयविकाराचा झटका बसल्यानंतरच अँजिओप्लास्टी करावी लागते. चार-पाच स्टेंट टाकले तरी हृदय पूर्वीसारखे राहत नाही, मग आम्हाला सवलतीबाहेर का ठेवावे?” असा संतप्त सवाल एका शिक्षकाने केला आहे. “या निर्णयामुळे छातीत कळ येतेय!” असाही सूर शिक्षकांमधून ऐकावयास मिळत आहे

यंदाच्या बदल्यांमध्ये पदोन्नती, संचमान्यता, समानीकरण आणि अतिरिक्त शिक्षक यांसारख्या सगळ्याच मुद्द्यांवर गोंधळ उडालेला आहे. न्यायालयीन खटले सुरू असून, ३१ मेपूर्वी बदल्या पूर्ण करण्याचा शासन आदेश हवेतच विरला आहे. शैक्षणिक वर्ष सुरू असताना अचानक बदल्यांचा घाट घालण्यात आल्याने विद्यार्थ्यांचेही नुकसान होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

चुकीचा लाभ दिल्याने संवर्ग ४ मधील शिक्षकांवर मोठा अन्याय होत आहे. ते ३-५ वर्षे दूरवर हलवले जाणार असून, यातून वैयक्तिक, कौटुंबिक आणि शैक्षणिक अडचणी वाढणार आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने प्रक्रियेतील नियमानुसार त्रुटी दुरुस्त करून योग्य पद्धतीने पारदर्शी बदल्या राबवाव्यात, चुकीच्या पद्धतीने नियमबाह्य बदल्या केल्याने कारवाई करण्याची मागणी शिक्षक वर्गातून होत आहे.

(क्रमशः )

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…

2 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…

2 तास ago

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…

2 तास ago

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…

3 तास ago

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

13 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

14 तास ago