मुख्य बातम्या

नवीन वर्षाचा पहिला रविवार ठरला घात वार

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी येथील उचाळे वस्ती येथील ज्ञानेश्वर (माऊली) प्रभाकर उचाळे या ३२ वर्षीय युवकाचा रविवार (दि १) सायंकाळच्या सुमारास उचाळेवस्ती रोडवर झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ज्ञानेश्वर हा सायंकाळच्या वेळी मोटरसायकल वर चाललेला असताना चार चाकी वाहनाने त्याच धडक दिली या धडकेने रस्त्याच्या कडेने चालत असलेल्या एका व्यक्तीस मोटर सायकल आदळली व त्यामुळे त्या व्यक्तीचा पाय मोडला आहे. अपघातानंतर ज्ञानेश्वर व ती व्यक्ती (नाव समजू शकले नाही) दोघेही बेशुद्ध पडलेले होते.

संध्याकाळची वेळ असल्यामुळे रस्त्याने वाहतूक कमी होती. चार चाकी वाहन आणि धडक दिल्यानंतर सदर वाहन चालक वाहन घेऊन पळून गेला आहे. बराच वेळ अपघाताची कल्पना कोणालाही न मिळाल्यामुळे दोघेही बेशुद्ध अवस्थेत पडून होते. ज्ञानेश्वर याचा डोक्यात जबर मार लागल्याने त्याच्या डोक्याला सूज आली होती. रस्त्याने प्रवास करणारे एका व्यक्तीने रस्त्याच्या कडेला पडलेल्या ज्ञानेश्वर यास पाहिले परंतु डोक्याला सूज असल्यामुळे ओळख पटली नाही, त्याने इतरांना फोन करून कळविले.

मोटर सायकल पाहिल्यानंतर तो ज्ञानेश्वर असल्याची खात्री झाली. त्यास दवाखान्यात आणण्यात आले परंतु तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. दुसऱ्या व्यक्तीस सरकारी दवाखान्यात नेण्यात आले आहे. नवीन वर्षाचा पहिला रविवार हा घात वर ठरला असून टाकळी हाजी गावावर शोककळा पसरली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बारामतीकरांचा अभूतपूर्व कौल; सुनिल तटकरे यांचा मानाचा मुजरा, पश्चिम बंगाल परिवर्तनावरही भाष्य

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…

7 तास ago

बंगालमध्ये तृणमूल पिछाडीवर! वाघासारखं लढत राहू;  ममता बॅनरजी यांची प्रतिक्रिया

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…

7 तास ago

भोर नसरापूर प्रकरण! आरोपीला फाशीचीच शिक्षा होणार;  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर…

7 तास ago

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपावर काँग्रेसचा हल्लाबोल; सपकाळांचा गंभीर आरोप

मुंबई: काँग्रेस आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत मिळत होती, मात्र २०१४ नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर…

7 तास ago

नातं हृदयाशी; बायपास सर्जरी

बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन…

11 तास ago

दक्षिणेत भाजपाला नकार, केरळमध्ये काँग्रेसचा विजय लोकशाहीचा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर…

11 तास ago