शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे १८१८ साली झालेल्या लढाई मध्ये शौर्य दाखवले गेले त्या शौर्याचे प्रतिक म्हणून येथे उभारण्यात आलेल्या जय स्तंभाला मानवंदना दिल्याने मोठी उर्जा मिळते, असे मत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले.
कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे शौर्यदिनाच्या निमित्ताने नुकतीच जयस्तंभ येथे हजेरी लावत तृप्री देसाई यांनी जयस्तंभास अभिवादान केले. यावेळी प्रशांत देसाई, आकाश वढवराव, प्रमोद कुतवळ, मंगल सासवडे, संगीता तावरे, रीना सोनवणे, रमा आठवले, रुख्मिणी बोबडे, अपेक्षा सोनवणे यांसह आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान यावेळी बोलताना १८१८ साली झालेल्या लढाई मध्ये शौर्य दाखवले गेले त्या शौर्याची मानवंदना देण्यासाठी नागरिक येथे येत असतात. यापूर्वी कोरोनाचे निर्बंध लादण्यात आलेले होते. मात्र यावर्षी कोणतेही निर्बंध नसल्याने येथे 15 लाख भीमसैनिक येथे मानवंदना देण्यासाठी येणार आहेत. येणाऱ्या समाज बांधवानी येथे येताना शांततेत यावे, असे आवाहन देखील भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केले.
शासनाचे सर्व नियम पाळल्यास शौर्यदिन शांततेत पार पडेल असे सांगत येथील कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ समिती मोठे कष्ट घेत असते प्रत्येक नागरिकाला काहीही त्रास होणार नाही, महिलांचे नियोजन, येथील अनेक दुकानदार यांची विशेष काळजी कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे व त्यांचे सहकारी घेत असल्याने सदर समितीचे कार्य देखील कौतुकास्पद असल्याने देखील भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी सांगितले.
हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…
कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…
1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…
मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा,…
मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या 'खिडकी' या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित…
बारामतीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान थांबवला ताफा; जखमी तरुणीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…