शिरूर तालुका

विजयस्तंभाच्या मानवंदनेने उर्जा मिळते; तृप्ती देसाई

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे १८१८ साली झालेल्या लढाई मध्ये शौर्य दाखवले गेले त्या शौर्याचे प्रतिक म्हणून येथे उभारण्यात आलेल्या जय स्तंभाला मानवंदना दिल्याने मोठी उर्जा मिळते, असे मत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे शौर्यदिनाच्या निमित्ताने नुकतीच जयस्तंभ येथे हजेरी लावत तृप्री देसाई यांनी जयस्तंभास अभिवादान केले. यावेळी प्रशांत देसाई, आकाश वढवराव, प्रमोद कुतवळ, मंगल सासवडे, संगीता तावरे, रीना सोनवणे, रमा आठवले, रुख्मिणी बोबडे, अपेक्षा सोनवणे यांसह आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान यावेळी बोलताना १८१८ साली झालेल्या लढाई मध्ये शौर्य दाखवले गेले त्या शौर्याची मानवंदना देण्यासाठी नागरिक येथे येत असतात. यापूर्वी कोरोनाचे निर्बंध लादण्यात आलेले होते. मात्र यावर्षी कोणतेही निर्बंध नसल्याने येथे 15 लाख भीमसैनिक येथे मानवंदना देण्यासाठी येणार आहेत. येणाऱ्या समाज बांधवानी येथे येताना शांततेत यावे, असे आवाहन देखील भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केले.

शासनाचे सर्व नियम पाळल्यास शौर्यदिन शांततेत पार पडेल असे सांगत येथील कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ समिती मोठे कष्ट घेत असते प्रत्येक नागरिकाला काहीही त्रास होणार नाही, महिलांचे नियोजन, येथील अनेक दुकानदार यांची विशेष काळजी कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे व त्यांचे सहकारी घेत असल्याने सदर समितीचे कार्य देखील कौतुकास्पद असल्याने देखील भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

16 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

16 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

16 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

16 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

17 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

18 तास ago