शिरूर तालुका

विजयस्तंभाच्या मानवंदनेने उर्जा मिळते; तृप्ती देसाई

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे १८१८ साली झालेल्या लढाई मध्ये शौर्य दाखवले गेले त्या शौर्याचे प्रतिक म्हणून येथे उभारण्यात आलेल्या जय स्तंभाला मानवंदना दिल्याने मोठी उर्जा मिळते, असे मत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे शौर्यदिनाच्या निमित्ताने नुकतीच जयस्तंभ येथे हजेरी लावत तृप्री देसाई यांनी जयस्तंभास अभिवादान केले. यावेळी प्रशांत देसाई, आकाश वढवराव, प्रमोद कुतवळ, मंगल सासवडे, संगीता तावरे, रीना सोनवणे, रमा आठवले, रुख्मिणी बोबडे, अपेक्षा सोनवणे यांसह आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान यावेळी बोलताना १८१८ साली झालेल्या लढाई मध्ये शौर्य दाखवले गेले त्या शौर्याची मानवंदना देण्यासाठी नागरिक येथे येत असतात. यापूर्वी कोरोनाचे निर्बंध लादण्यात आलेले होते. मात्र यावर्षी कोणतेही निर्बंध नसल्याने येथे 15 लाख भीमसैनिक येथे मानवंदना देण्यासाठी येणार आहेत. येणाऱ्या समाज बांधवानी येथे येताना शांततेत यावे, असे आवाहन देखील भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केले.

शासनाचे सर्व नियम पाळल्यास शौर्यदिन शांततेत पार पडेल असे सांगत येथील कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ समिती मोठे कष्ट घेत असते प्रत्येक नागरिकाला काहीही त्रास होणार नाही, महिलांचे नियोजन, येथील अनेक दुकानदार यांची विशेष काळजी कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे व त्यांचे सहकारी घेत असल्याने सदर समितीचे कार्य देखील कौतुकास्पद असल्याने देखील भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

13 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

20 तास ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

2 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

2 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

2 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

2 दिवस ago