शिरुर (तेजस फडके) देशात महिलांना राजकीय सक्षमीकरण मिळावे, निर्णय प्रक्रियेत त्यांचा थेट सहभाग वाढावा आणि सत्तेच्या केंद्रस्थानी महिलांचे नेतृत्व उभे राहावे. या उद्देशाने ग्रामपंचायतीपासून थेट संसदेपर्यंत महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र वास्तवात अनेकवेळा वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये ठिकाणी “महिला निवडून येते; पण कारभार मात्र पतीच चालवतात” अशीच परिस्थिती उघडपणे दिसून येत असल्याने कारभारनीच्या नथीतुन तीर मारणाऱ्या पतीराजांच्या हस्तक्षेपांमुळे मुळ उद्देशावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.
पुणे जिल्ह्यासह शिरुर तालुक्यातही अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला प्रतिनिधींपेक्षा त्यांच्या पतींचाच प्रभाव अधिक जाणवत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. बैठका, अधिकाऱ्यांशी संपर्क, निधीवाटप, विकासकामांचे निर्णय, कार्यकर्त्यांशी समन्वय, शासकीय कागदपत्रांची हालचाल अशा अनेक बाबींमध्ये महिला पदाधिकाऱ्यांऐवजी त्यांचे पती किंवा पुरुष नातेवाईकांचा हस्तक्षेप वाढत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
“आरक्षण महिलांचे…सत्ता मात्र पुरुषांची…?”
महिला आरक्षणामुळे हजारो महिलांना राजकारणात प्रवेश मिळाला, हे नाकारता येणार नाही. ग्रामीण भागातील अनेक महिला प्रथमच सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचल्या. मात्र काही ठिकाणी “नाव महिला प्रतिनिधीचे आणि निर्णय पुरुषांचे” असे विचित्र वास्तव सगळीकडे दिसत आहे. स्थानिक राजकारणात “सरपंच पती”, “सदस्या पती”, “नगरसेविका पती” या संज्ञा इतक्या सामान्य झाल्या आहेत की जणू त्या लोकशाही व्यवस्थेचाच भाग बनल्या आहेत. अनेक ठिकाणी अधिकृत बैठकीत महिला प्रतिनिधी शांत बसलेल्या दिसतात; पण सर्व चर्चा, बोलणी आणि आदेश मात्र त्यांचे पती देताना दिसतात.
महिला प्रतिनिधी फक्त सही पुरत्याच का…?
राजकीय विश्लेषकांच्या मते, सुरुवातीला प्रशासनिक अनुभव नसल्यामुळे काही महिला कुटुंबीयांची मदत घेतात, हे स्वाभाविक असू शकते. मात्र अनेक प्रकरणांमध्ये हि मदत थेट हस्तक्षेपात रुपांतरित होत असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी महिला प्रतिनिधी केवळ सही करण्यापुरत्या मर्यादित राहतात, तर प्रत्यक्ष सत्ता पुरुषांकडेच केंद्रित राहते. महिला आरक्षणाचा उद्देश महिलांना निर्णयक्षम बनवण्याचा होता; मात्र काही ठिकाणी तो “राजकीय प्रॉक्सी सिस्टम”मध्ये बदलत असल्याचे चित्र समोर येत आहे. यामुळे महिला नेतृत्व निर्माण होण्याऐवजी पुरुषांचे अप्रत्यक्ष राजकीय वर्चस्व अधिक मजबूत होत असल्याची दबक्या आवाजात सगळीकडे ‘चर्चा’ सुरु आहे.
(क्रमश:)
शिरुर तालुक्यात हॉटेल समोरच तरुणावर हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
शिक्रापुरमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी; ८० हजारांचा ऐवज लंपास
शिरुर (घोडनदी) न्यायालयाचा धनादेश अनादर प्रकरणी दोषी आरोपीला दणका
मुंबई: भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.…
शिरूर : शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर हालचालींना…
मुंबई : विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विकासकामे…
मुंबई : नांदेड जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनविस्ताराला आणखी बळ मिळाले आहे. शंकरअण्णा धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि…
शिरुर (तेजस फडके): अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या खुनाचा प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील…
मंचर (प्रतिनिधी): दूधात भेसळ करुन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या टोळीविरुद्ध मंचर पोलिसांनी सुरु केलेल्या कारवाईला…