शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिक्रापुर परिसरात घरफोडीच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ होत असून, पाबळ फाटा येथील सिद्धी अपार्टमेंटमध्ये अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या घरफोडी करुन तब्बल ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी भोपेंद्रसिंग सुदामसिंग पाटील (वय ३२) रा. रिद्धी-सिद्धी अपार्टमेंट, पाबळफाटा, शिक्रापुर, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिक्रापुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असुन अज्ञात इसमाविरोधात घरफोडीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शिक्रापुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. ११ मे २०२६ रोजी सकाळी ६ ते दुपारी ३:२० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. फिर्यादी घराबाहेर असताना अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाज्याचे कडी-कोयंडे तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटे फोडून मौल्यवान वस्तूंवर हात साफ करण्यात आला.
या अज्ञात चोरट्यानी घरातील सुमारे ६० हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी तसेच २० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ८० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, शिक्रापुर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून चोरी, घरफोडी आणि वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
शिक्रापुर परिसरात दिवसाढवळ्या बंद घरांवर पाळत ठेवून चोरट्यांकडून गुन्हे घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पोलीस गस्त वाढविण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.शिक्रापुर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरु केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार भालेराव हे करत आहेत.
शिरुर तालुक्यात हॉटेल समोरच तरुणावर हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
शिरुर (घोडनदी) न्यायालयाचा धनादेश अनादर प्रकरणी दोषी आरोपीला दणका
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) सणसवाडी (ता. शिरुर) परिसरात किरकोळ वादातून दोन जणांनी एका तरुणाला बेदम मारहाण…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्याच्या पुर्व भागातील एका गावात घरफोडीची धक्कादायक घटना समोर आली…
मुंबई: देशातील सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता पंतप्रधान Narendra Modi यांनी विदेशी चलनाची बचत करण्यासाठी अनावश्यक…
गुवाहाटी: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसाममधील भाजपच्या ऐतिहासिक विजयाबद्दल जनतेचे आभार मानत हिमंता…
साखर तयार करण्याचा सर्वांत पहिला कारखाना भारतात इंग्रजांनी सन १८६८ मध्ये सुरु केला. त्याआधी भारतीय…
आलं आरोग्यासाठी फार चांगलं असतं. हे आपल्याला माहिती आहेच. आहारामध्ये आल्याचा समावेश असणे फार फायद्याचे…