मुख्य बातम्या

शिरूर वनविभागातील वनपाल महिलेची दोन वर्षाची वेतनवाढ कायम स्वरूपी रद्द

तर वनरक्षकाचे दोन वर्षांचे वेतनवाढ रोखले, आरटीआय कार्यकर्ते अशोक भोरडे यांच्या तक्रारीचा दणका..

शिरूर (तेजस फडके): शिरूर वनपरीक्षेत्र कार्यालयातील शिक्रापूर बीटातील राखीव वन क्षेत्रामध्ये झालेले बेकायदा उत्खनन, वृक्षतोड आणि कोळसा उत्पादन यासंदर्भात उघडकीस आलेल्या गंभीर निष्काळजीपणामुळे वनपाल गौरी हिंगणे व वनरक्षक विशाल चव्हाण या दोन वन कर्मचाऱ्यांवर विभागीय चौकशीनंतर शिस्तभंगाची व दोन वर्षाच्या वेतनवाढी रद्द करण्याची कठोर कारवाई करण्यात आली आहे.

आरटीआय तथा व्हिसल ब्लोअर कार्यकर्ते अशोक रावसाहेब भोरडे (रा. निमगाव म्हाळुंगी) यांच्या तक्रारीनंतर मौजे उरळगांव व आलेगांव पागा (ता. शिरूर) येथील राखीव वनक्षेत्रात जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात माती उत्खनन व वृक्षतोड झाल्याचे स्पष्ट झाले. वनपाल गौरी हिरामण हिंगणे आणि वनरक्षक विशाल मंगलदास चव्हाण या कर्मचाऱ्यांनी यामध्ये जबाबदारी न पार पाडल्याचे दोषारोप ठेवण्यात आले होते.

सहाय्यक वनसंरक्षक, वन्यजीव संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन, यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या स्थळ पाहणी अहवालात नमूद आहे की,उरळगांवमध्ये 208.26 घ.मी. आणि आलेगांव पागामध्ये 420.27 घ.मी. मातीचे उत्खनन अंदाजे 1000 ते 1200 ब्रास मातीची वाहतूक,24 वृक्षांची फांदीतून किंवा मुळासकट तोड,कोळसा भट्टी लावून वृक्षसंपदेचा वापर. या कारवायांना अनभिज्ञ राहणे, वेळेत गुन्हा नोंद न करणे, आणि वनसंरक्षणाच्या कर्तव्यात निष्काळजीपणा दाखवणे, हे दोघाही अधिकाऱ्यांच्या शिस्तभंगाचे प्रमुख कारण ठरले.

जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ नुसार गौरी हिरामण हिंगणे यांची पुढील दोन वार्षिक वेतनवाढी (२०२५ व २०२६) कायमस्वरूपी रोखण्यात आली.व विशाल मंगलदास चव्हाण यांची पुढील दोन वर्षाच्या वेतनवाढी दोन वर्षाच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात रोखण्यात आल्या आहेत असा लेखी आदेश दिला आहे.

वनसंरक्षणाची जबाबदारी अत्यंत नाजूक असून, वनक्षेत्रातील अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे निसर्गसंपदा धोक्यात येते. याप्रकरणी संबंधित दोघा कर्मचार्यांनी कामात प्रामाणिकपणा न ठेवता वनगुन्हे लपवले किंवा दुर्लक्ष केले, हे स्पष्ट होत असून यावर वनविभागाने उचललेली पावले महत्त्वाची ठरली आहेत.ही कारवाई म्हणजे केवळ दोन कर्मचाऱ्यांवरची शिक्षा नसून, संपूर्ण वनविभागाला “कायम दक्ष राहा” असा इशारावजा संदेश देणारी आहे. या प्रकरणामुळे वनविभागाची प्रतिमा मलिन झाली असून या दोन कर्मचाऱ्यांवर शिरूर तालुक्यातून याबाबत टीका होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सणसवाडीत ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; बॅरलमध्ये पाणी भरून कंपनीची दिशाभूल, दोन सराईत चोरटे अटकेत

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील झेनिथ बायोकेमिकल इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीतून तब्बल ८०० लिटर डिझेल…

2 तास ago

महाराष्ट्राला ‘समग्र शिक्षा’त अधिक निधी द्या; केंद्रीय परिषदेत दादाजी भुसे यांची जोरदार मागणी

मुंबई: देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी ८.६१ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असतानाही ‘समग्र शिक्षा’ योजनेच्या…

2 तास ago

विद्यार्थ्यांवर लाठीमार म्हणजे लोकशाहीवरील काळा डाग; हे विद्यार्थ्यांच्या जिवावर उठलेलं निष्ठूर सरकार; विजय वडेट्टीवार

सिंदेवाही: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध…

2 तास ago

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

19 तास ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

19 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

19 तास ago