शिरुर (अरुणकुमार मोटे): एकीकडे शासण कोटयावधी रुपये खर्चुन झाडे लावा, झाडे जगवा अशी योजना निसर्गाचा समतोल राखण्यासाठी अनेक वर्षापासून प्रभावीपणे राबवत असताना शिरुरच्या पंचायत समिती मध्ये चक्क मध्यरात्री झांडाची जबाबदार अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विनापरवाना कत्तल करण्यात आली आहे. त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचर्णे यांनी केली आहे.
शिरूर पंचायत समितीच्या सुशोभिकरणा साठी प्रभारी गटविकास आधिकारी यांनी ग्रामपंचायतीचा विकास निधी मोठ्या प्रमाणावर सुशोभिकरणासाठी वापरल्याचा आरोप शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) अविनाश घोगरे, सुनिल जाधव यांनी केला आहे.त्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतींना विकासनिधी मिळाला नाही. यासाठी वरीष्ठांची परवानगी घेतली का?याची चौकशी होणे गरजेच असल्याचे घोगरे यांनी सांगितले आहे
या आधिकाऱ्याला राजकिय पुढाऱ्यांचे पाठबळ मिळत असल्याची चर्चा होत असून वृक्षतोड प्रकरणी शिरूर नगर परीषद पंचनामा करूनही पुढील कार्यवाही का करत नाही. पुढील कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा नाथाभाऊ पाचर्णे यांनी दिला आहे. या विषयी शिरूर नगरपरीषदेचे मुख्याधिकारी प्रसाद बोरकर यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…
सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…