शिरुर (अरुणकुमार मोटे): एकीकडे शासण कोटयावधी रुपये खर्चुन झाडे लावा, झाडे जगवा अशी योजना निसर्गाचा समतोल राखण्यासाठी अनेक वर्षापासून प्रभावीपणे राबवत असताना शिरुरच्या पंचायत समिती मध्ये चक्क मध्यरात्री झांडाची जबाबदार अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विनापरवाना कत्तल करण्यात आली आहे. त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचर्णे यांनी केली आहे.
शिरूर पंचायत समितीच्या सुशोभिकरणा साठी प्रभारी गटविकास आधिकारी यांनी ग्रामपंचायतीचा विकास निधी मोठ्या प्रमाणावर सुशोभिकरणासाठी वापरल्याचा आरोप शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) अविनाश घोगरे, सुनिल जाधव यांनी केला आहे.त्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतींना विकासनिधी मिळाला नाही. यासाठी वरीष्ठांची परवानगी घेतली का?याची चौकशी होणे गरजेच असल्याचे घोगरे यांनी सांगितले आहे
या आधिकाऱ्याला राजकिय पुढाऱ्यांचे पाठबळ मिळत असल्याची चर्चा होत असून वृक्षतोड प्रकरणी शिरूर नगर परीषद पंचनामा करूनही पुढील कार्यवाही का करत नाही. पुढील कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा नाथाभाऊ पाचर्णे यांनी दिला आहे. या विषयी शिरूर नगरपरीषदेचे मुख्याधिकारी प्रसाद बोरकर यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
राजगुरूनगर: राजगुरुनगर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, मावा, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम…
मुंबई: मुंबई उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरातील डोंगराळ भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात घडणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे…
मुंबई: राज्यातील तंत्रशिक्षण क्षेत्रात प्रशासन अधिक पारदर्शक, कार्यक्षम, उत्तरदायी आणि डेटा-आधारित करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावात सामाईक वापरातील इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात एका महिलेचा मृत्यू…
चणे हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. रोज भाजलेले हरभऱ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून…