शिरुर (अरुणकुमार मोटे): एकीकडे शासण कोटयावधी रुपये खर्चुन झाडे लावा, झाडे जगवा अशी योजना निसर्गाचा समतोल राखण्यासाठी अनेक वर्षापासून प्रभावीपणे राबवत असताना शिरुरच्या पंचायत समिती मध्ये चक्क मध्यरात्री झांडाची जबाबदार अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विनापरवाना कत्तल करण्यात आली आहे. त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचर्णे यांनी केली आहे.
शिरूर पंचायत समितीच्या सुशोभिकरणा साठी प्रभारी गटविकास आधिकारी यांनी ग्रामपंचायतीचा विकास निधी मोठ्या प्रमाणावर सुशोभिकरणासाठी वापरल्याचा आरोप शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) अविनाश घोगरे, सुनिल जाधव यांनी केला आहे.त्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतींना विकासनिधी मिळाला नाही. यासाठी वरीष्ठांची परवानगी घेतली का?याची चौकशी होणे गरजेच असल्याचे घोगरे यांनी सांगितले आहे
या आधिकाऱ्याला राजकिय पुढाऱ्यांचे पाठबळ मिळत असल्याची चर्चा होत असून वृक्षतोड प्रकरणी शिरूर नगर परीषद पंचनामा करूनही पुढील कार्यवाही का करत नाही. पुढील कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा नाथाभाऊ पाचर्णे यांनी दिला आहे. या विषयी शिरूर नगरपरीषदेचे मुख्याधिकारी प्रसाद बोरकर यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…