मुख्य बातम्या

शिरुर शहरात आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरात स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट व स्टोरी ठेवून दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल असे कृत्य केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने याबाबत रेहान असिफ काझी या युवकांवर शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेहान असिफ काझी व इतर चार इतर अल्पवयीन मुलांनी स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट व स्टोरी ठेवल्याचे शिरुर पोलिसांच्या निदर्शनास आले.यावेळी पोलिसांनी असिफ सह चार अल्पवयीन युवकांवर ताब्यात घेत कारवाई केली. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल राजेंद्र गोपाळे यांनी फिर्याद दाखल केल्याने संबंधित युवकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी शिरूर पोलिस स्टेशन येथे भेट घेत ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले. या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे,शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, नायब तहसिलदार स्नेहा गिरिगोसावी आदींसह पोलिस अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आमदार संजय गायकवाडांचे विधान विकृत; कारवाईस सरकार का घाबरते? हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…

2 तास ago

हाच का डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाजपचा आदर? अनंत गाडगीळ यांचा संतप्त सवाल

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ परिसरातील परिस्थितीवरून काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते…

2 तास ago

मुंबईत 27-28 एप्रिलला आंतरराष्ट्रीय रिव्हर्स बायर-सेलर मीट; एमएसएमई उद्योगांना निर्यातीच्या नव्या संधी

मुंबई: महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादिततर्फे महाराष्ट्र शासनाच्या ‘रॅम्प’ (रायझिंग अँड ॲक्सेलेरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स) उपक्रमांतर्गत…

2 तास ago

शिरूर तालुक्यात अवैध दारूविरोधात पोलिसांची धडक मोहीम; विविध ठिकाणी छापे…

शिरूर : अवैध धंदे बंद करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी शिरूरमध्ये निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आंदोलन…

3 तास ago

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

23 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

23 तास ago