आरोग्य

तुम्ही जास्त साखर खाताय हे सांगणारी १० लक्षणं, शरीर साखरेनं पोखरण्यापूर्वी जागे व्हा…

साखर आपल्या शरीरासाठी मुलभूत स्त्रोत मानली जाते. फळे आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळणारी नैसर्गिक साखर फायबर आणि पोषक तत्वांमुळे आरोग्यासाठी कमी हानिकारक असते.

जर तुम्हालाही अति प्रमाणात साखर खाण्याची सवय जडली असेल तर हे गंभीर आजार जडू शकतात. याविषयी तुम्हाला माहित असायला हवं.

जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने भूक वाढू शकते. यात प्रथिने आणि फायबर सारख्या पोषक तत्वांचा अभाव असतो. ज्यामुळे वजन वाढू शकतं.

साखरेचे सेवन अधिक केल्यास चेहऱ्यावर पुरळ, मुरुमे आणि अकाली वृद्धत्व येते.रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने जळजळ आणि हार्मोन्स असंतुलित होऊ शकतात.

संशोधनातून असं समजलं आहे की, साखरेचा संबंध रक्तदाबाशी जोडण्यात आला आहे. साखरयुक्त पेयांमधून उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

जास्त साखरेचा आहार झोपेच्या पद्धतीवर परिणाम करतात. जेव्हा रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतार होतो तेव्हा झोप न येण्याची समस्या निर्माण होते.

साखरेमुळे शरीराला ऊर्जा मिळत असली तरी ती काही प्रमाणातच असते. यामुळे ऊर्जेची पातळी कमी होते. थकवा आणि ऊर्जेची कमतरता जाणवू शकते.

साखरेचे प्रमाण जास्त झाल्यास शरीरात जळजळ होऊ शकते. ज्यामुळे सांधेदुखीचा त्रास सुरु होतो. यामुळे अस्वस्थता वाढते.

साखरेमुळे तोंडात बॅक्टेरिया तयार होतात. आम्ल तयार होऊन दातांमध्ये पोकळी निर्माण करते किंवा दात खराब होतात.

रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतार होऊन मूडवर परिणाम करतो. ज्यामुळे मूड स्विंग होऊन चिडचिडेपणा वाढतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली; आम्ही ती वेगाने कनेक्ट केली; एकनाथ शिंदे

रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…

22 तास ago

पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा सत्ताधा-यांचा डाव; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…

22 तास ago

१०७ हुतात्म्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कुठे? कामगार, भाषा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…

23 तास ago

पत्नी खून प्रकरणात दत्तात्रय गायकवाड निर्दोष; परिस्थितीजन्य पुरावे ठरले अपुरे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…

23 तास ago

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

2 दिवस ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

2 दिवस ago