साखर आपल्या शरीरासाठी मुलभूत स्त्रोत मानली जाते. फळे आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळणारी नैसर्गिक साखर फायबर आणि पोषक तत्वांमुळे आरोग्यासाठी कमी हानिकारक असते.
जर तुम्हालाही अति प्रमाणात साखर खाण्याची सवय जडली असेल तर हे गंभीर आजार जडू शकतात. याविषयी तुम्हाला माहित असायला हवं.
जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने भूक वाढू शकते. यात प्रथिने आणि फायबर सारख्या पोषक तत्वांचा अभाव असतो. ज्यामुळे वजन वाढू शकतं.
साखरेचे सेवन अधिक केल्यास चेहऱ्यावर पुरळ, मुरुमे आणि अकाली वृद्धत्व येते.रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने जळजळ आणि हार्मोन्स असंतुलित होऊ शकतात.
संशोधनातून असं समजलं आहे की, साखरेचा संबंध रक्तदाबाशी जोडण्यात आला आहे. साखरयुक्त पेयांमधून उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
जास्त साखरेचा आहार झोपेच्या पद्धतीवर परिणाम करतात. जेव्हा रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतार होतो तेव्हा झोप न येण्याची समस्या निर्माण होते.
साखरेमुळे शरीराला ऊर्जा मिळत असली तरी ती काही प्रमाणातच असते. यामुळे ऊर्जेची पातळी कमी होते. थकवा आणि ऊर्जेची कमतरता जाणवू शकते.
साखरेचे प्रमाण जास्त झाल्यास शरीरात जळजळ होऊ शकते. ज्यामुळे सांधेदुखीचा त्रास सुरु होतो. यामुळे अस्वस्थता वाढते.
साखरेमुळे तोंडात बॅक्टेरिया तयार होतात. आम्ल तयार होऊन दातांमध्ये पोकळी निर्माण करते किंवा दात खराब होतात.
रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतार होऊन मूडवर परिणाम करतो. ज्यामुळे मूड स्विंग होऊन चिडचिडेपणा वाढतो.
(सोशल मीडियावरून साभार)
सहा वर्षे आश्वासनांची मालिका, 'स्टॉप पेमेंट' धनादेशांचा धक्का; तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व संगनमताचे गंभीर…
'देवाभाऊ' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे…
मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून-जुलै 2026 या कालावधीत राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री,…
नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या 'मंडल यात्रा'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय…
ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल…
भंडारा: सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने आयोजित मंडल यात्रा २०२६ ला आज भंडारा येथून उत्साहात प्रारंभ…