आरोग्य

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे दिसून येतात ५ लक्षणं, येऊ शकतो हृदय विकाराचा झटका

शरीर निरोगी राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. ऋतू कोणताही असो शरीराला पाणी आवश्यक आहे. पण कामाच्या व्यापामुळे किंवा इतर कारणांमुळे आपण कमी प्रमाणात पाणी पितो. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास विविध समस्या निर्माण होतात.

शरीरात पाण्याची कमतरता भासल्यास ओठ कोरडे पडणे किंवा फाटणे या खुणा दिसून येतात. याव्यतिरिक्त आपले शरीर अनेक संकेत देते. ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता ओळखता येऊ शकते. शरीरात पाण्याची कमतरता भासल्यास शरीर नक्की कोणते संकेत देते? पाहूया.

हृदयाच्या आरोग्यावर धोका

पाण्याच्या कमतरतेचा थेट परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो. कारण डिहायड्रेशनचा शरीराच्या अवयवांवर आणि कार्यांवर नकारात्मक परिणाम होतो. मुख्य म्हणजे हृदयाच्या कार्यावरही परिणाम होतो.

अनियमित हृदयाचे ठोके

शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यासाठी पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलन होऊ शकते, ज्यामुळे हृदयाच्या ठोक्यावर देखील परिणाम होतो.

रक्त प्रवाह कमी होऊ लागतो

पाण्याच्या कमतरतेमुळे रक्त घट्ट होते. ज्यामुळे शरीरातील रक्त प्रवाह कमी होतो. घट्ट रक्त पंप करण्यासाठी हृदयावर अधिक दबाव टाकला जातो. अशा स्थितीत उच्च रक्तदाब आणि हृदयाच्या इतर समस्या उद्भवू शकतात.

शरीराचे तापमान असंतुलित होते

पाणी शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करते. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीराच्या तापमानात असंतुलन होऊ शकते, ज्यामुळे हृदयावर देखील दबाव वाढतो.

किडनीवर विपरीत परिणाम

पाण्याच्या कमतरतेमुळे किडनीवरही वाईट परिणाम होतो आणि किडनीच्या समस्यांमुळे हृदयावरही नकारात्मक परिणाम होतो, कारण दोन्ही अवयव एकमेकांशी जोडलेले असतात.

चयापचय मंदावते

पाण्याच्या कमतरतेमुळे चयापचय मंदावते. ज्यामुळे शरीरातील चरबी आणि विषारी पदार्थ वाढण्याचा धोका वाढू शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई ते सुरजागड! विकासाच्या महामार्गावर महाराष्ट्र; १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; एकनाथ शिंदे

मुंबई: “विकसित भारत २०४७”च्या दिशेने वाटचाल करताना महाराष्ट्र वेगाने प्रगती करत असून मुंबईपासून गडचिरोलीतील सुरजागडपर्यंत…

4 तास ago

वोटचोरी करून भाजप सत्तेत; लोकशाहीशी खेळ करणाऱ्यांना जेलमध्ये जावे लागेल; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार यादीत फेरफार करून महाराष्ट्रात सत्ता मिळवली असून बिहार…

4 तास ago

शिरुर तालुक्यातील निखिल इचके मृत्यू प्रकरणात “अपघात की घातपात…?”

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथील युवक निखिल संदीप इचके यांच्या संशयास्पद मृत्यू…

4 तास ago

‘कॉकरोच जनता पार्टी’ ते संविधानप्रेम; बदलले फक्त शब्द नव्हे, भूमिकाही!

मुंबई : सार्वजनिक जीवनात काही घटना अशा घडतात की त्यांची नोंद इतिहासापेक्षा विनोदाच्या पुस्तकात व्हावी…

4 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांना १५ ऑगस्टपर्यंत मराठी शिकणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता यावा यासाठी अमराठी चालकांना १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक…

4 तास ago

रांजणगाव MIDC मध्ये विजेच्या धक्क्याची गंभीर घटना; ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे कामगाराचा जीव धोक्यात…?

कारेगाव (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीत एका कंपनीच्या विद्युत दुरुस्तीच्या कामादरम्यान मोठी…

8 तास ago