आरोग्य

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे दिसून येतात ५ लक्षणं, येऊ शकतो हृदय विकाराचा झटका

शरीर निरोगी राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. ऋतू कोणताही असो शरीराला पाणी आवश्यक आहे. पण कामाच्या व्यापामुळे किंवा इतर कारणांमुळे आपण कमी प्रमाणात पाणी पितो. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास विविध समस्या निर्माण होतात.

शरीरात पाण्याची कमतरता भासल्यास ओठ कोरडे पडणे किंवा फाटणे या खुणा दिसून येतात. याव्यतिरिक्त आपले शरीर अनेक संकेत देते. ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता ओळखता येऊ शकते. शरीरात पाण्याची कमतरता भासल्यास शरीर नक्की कोणते संकेत देते? पाहूया.

हृदयाच्या आरोग्यावर धोका

पाण्याच्या कमतरतेचा थेट परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो. कारण डिहायड्रेशनचा शरीराच्या अवयवांवर आणि कार्यांवर नकारात्मक परिणाम होतो. मुख्य म्हणजे हृदयाच्या कार्यावरही परिणाम होतो.

अनियमित हृदयाचे ठोके

शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यासाठी पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलन होऊ शकते, ज्यामुळे हृदयाच्या ठोक्यावर देखील परिणाम होतो.

रक्त प्रवाह कमी होऊ लागतो

पाण्याच्या कमतरतेमुळे रक्त घट्ट होते. ज्यामुळे शरीरातील रक्त प्रवाह कमी होतो. घट्ट रक्त पंप करण्यासाठी हृदयावर अधिक दबाव टाकला जातो. अशा स्थितीत उच्च रक्तदाब आणि हृदयाच्या इतर समस्या उद्भवू शकतात.

शरीराचे तापमान असंतुलित होते

पाणी शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करते. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीराच्या तापमानात असंतुलन होऊ शकते, ज्यामुळे हृदयावर देखील दबाव वाढतो.

किडनीवर विपरीत परिणाम

पाण्याच्या कमतरतेमुळे किडनीवरही वाईट परिणाम होतो आणि किडनीच्या समस्यांमुळे हृदयावरही नकारात्मक परिणाम होतो, कारण दोन्ही अवयव एकमेकांशी जोडलेले असतात.

चयापचय मंदावते

पाण्याच्या कमतरतेमुळे चयापचय मंदावते. ज्यामुळे शरीरातील चरबी आणि विषारी पदार्थ वाढण्याचा धोका वाढू शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शरद पवारांच्या NDA प्रवेशाच्या चर्चेला उधाण; पृथ्वीराज चव्हाणांचे आवाहन, सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NDAसोबत जाणार…

8 तास ago

उन्हाळ्यात ताक प्यावं पण कधी, दुपारी-रात्री की कधीही?

उन्हाळ्यात शरीराला आतून थंडगार ठेवण्यासाठी आपण आहारात दही - ताकाचा समावेश करतो. या दिवसांत दही…

9 तास ago

दिवसभरात आपण किती वेळा श्वास घेतो

२४ तासात मनुष्य किती वेळा श्वास घेतो? मानवी शरीर प्रत्यक्षात एखाद्या रहस्याहून कमी नाही. किंबहुना…

9 तास ago

किडनी स्टोन समस्या आणि काळजी

किडनी स्टोनचा त्रास खूप भयंकर आणि असह्य असतो. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी सोबतच कमी पाणी पिण्याची…

9 तास ago

दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? प्रताप सरनाईकांच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. शिंदे गटाचे…

9 तास ago

पोषण आहारावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अंगणवाडी सेविकेवर कारवाई; आंबेगावात प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न

पुणे : आंबेगाव तालुक्यात अंगणवाडीतील चिमुकल्यांना आणि स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जावर प्रश्न…

9 तास ago