आरोग्य

गरम पाणी पिण्याचे फायदे

१) गरम पाणी नियमितपणे प्यायल्याने मेटाबॉलिक रेट म्हणजेच चयापचय क्रियेचा वेग वाढतो. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे अधिक चांगल्या पद्धतीने पचन होते.

२) गरम पाण्यासोबत अनेक औषधी घेण्याचा सल्लाही डॉक्टर देतात. यामुळे औषधी शरीरात शोषून घेतलं जाण्याचं प्रमाण वाढतं.

३) चुकीच्या जीवनशैलीमुळे, चुकीच्या आहार पद्धतीमुळे शरीरावर सूज येते. यालाच आपण इन्फ्लामेशन म्हणतो. ही सूज कमी करण्यासाठी गरम पाणी पिणे फायदेशीर ठरते. शरीरावरची सूज कमी झाली की आपोआपच वजनही आकड्यांच्या स्वरुपात कमी झाल्याचे दिसून येते.

गरम पाणी पिण्याबाबत हे गैरसमज टाळा…

१) गरम पाणी प्यायलं की सर्दी- खोकल्याचा त्रास कमी होतो, हा एक मोठा गैरसमज आहे. गरम पाणी हा काही त्यावरचा उपाय नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात काही बदल करणे गरजेचे आहे.

२) तसेच गरम पाणी प्यायलं की काहीही खाल्लं तरी वजन कमी होणारच, असं काहीही नाही. वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यासोबतच आहारात आणि जीवनशैलीमध्ये काही पोषक, सकारात्मक बदल करणं गरजेचं आहे.

३) गरम पाणी पिणं सगळ्यांच्याच तब्येतीला मानवणारं नसतं. ज्यांना उष्णतेचा त्रास आहे, मुळव्याधीचा त्रास आहे, अशा लोकांनी गरम पाणी पिऊ नये.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई प्रेस क्लबमधून तीन सदस्यांची हकालपट्टी; भीमा कोरेगाव प्रकरणाशी संबंधित बैठक ठरली कारणीभूत

मुंबई: देशातील प्रतिष्ठित पत्रकार संघटनांपैकी एक असलेल्या Mumbai Press Club ने आपल्या तीन सदस्यांची हकालपट्टी…

8 तास ago

राज्यात पर्यटन विकासाला गती; पायाभूत सुविधा व सेवांचा दर्जा उंचावण्यावर भर; मंत्री शंभूराज देसाई

मुंबई: राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम, परिणामकारक आणि पर्यटकाभिमुख करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे, सेवांचा…

8 तास ago

कोल्हापूरात तरुणींवर अत्याचार व ब्लॅकमेल प्रकरण; मुख्य आरोपी अटकेत, साथीदार फरार

सोशल मीडियातून मैत्री करून लॉजवर नेऊन अत्याचार; अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप, १५ हून अधिक…

8 तास ago

महाराष्ट्रात कामगार कायद्यांचे नवे मसुदे जाहीर; ४५ दिवसांत हरकती-सूचना मागविल्या

मुंबई: राज्यातील कामगार क्षेत्रातील कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण…

8 तास ago

CSMT परिसरात हरवलेल्या ८ वर्षीय बालिकेचा तासाभरात शोध; महिला फौजदार चेतना पाटील यांचा मंत्रालयात सन्मान

मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथून कुटुंबासह मुंबईत पर्यटनासाठी आलेली ८ वर्षीय अनाबिया सुलतान मुस्ताक शेख ही…

8 तास ago

पत्रा चाळ रहिवाशांना दिलासा; भाड्यात १०% वाढीचा निर्णय

मुंबई: गोरेगावमधील पत्रा चाळ रहिवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात…

8 तास ago