आरोग्य

हिवाळ्यात ओव्याचा चहा पिण्याचे फायदे

1) गॅसची समस्या होईल दूर

बऱ्याच लोकांना नेहमीच गॅसची समस्य होत असते. अशा लोकांनी रोज सकाळी झोपेतून उठल्यावर ओव्याच्या चहाचं सेवन करावं. ओव्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात, जे पचन तंत्र मजबूत करतात आणि पोटासंबंधी अनेक समस्या दूर करतात.

2) वजन कमी होत

आजकाल बरेच लोक वाढलेल्या वजनामुळे वैतागलेले आहेत. अशा लोकांनी सुद्धा सकाळी दुधाचा चहा सोडून ओव्याच्या चहाचं सेवन करावं. सकाळी रिकम्या पोटी ओव्याचा चहा प्यायल्याने शरीरात जमा झालेलं फॅट वेगाने कमी होतं. ओव्याचा चहा प्यायल्याने शरीराचं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि याने वजन कमी करण्यास मदत मिळते.

3) तणाव कमी होतो

आजकालच्या धावपळीच्या जीवनात वेगवेगळ्या कारणांनी लोक तणावात असतात. अशात ओव्याच्या नियमित सेवनाने शरीराला एनर्जी मिळते आणि थकाव दूर होतो.

4) अस्थमामध्ये फायदेशीर

अस्थमासारखा आजार असलेल्या पीडित व्यक्तींनी ओव्याच्या चहाचं सेवन केलं पाहिजे. ओवा गरम असतो अशात अस्थमाच्या रूग्णांसाठी हा औषधाचं काम करतो. सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचा चहा प्यायल्याने अस्थमाच्या रूग्णांना मदत मिळते.

5) सर्दी-खोकला होईल दूर

आता काही प्रमाणात थंडी जाणवायला लागली आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये सर्दी, खोकला, कफ या समस्या कॉमन आहेत. अशात तुमच्यासाठी हिवाळ्यात ओव्याच्या चहाचं सेवन करणं फार फायदेशीर ठरत असतं.

कसा बनवाल ओव्याचा चहा?

ओव्याचा चहा बनवण्यासाठी 2 कप पाणी एका भांड्यात उकडून घ्या. यात अर्धा चमचा ओवा टाका आणि कमी आसेवर उकडू द्या. त्यानंतर हे पाणी नंतर एका कपमध्ये टाका आणि वरून त्यात थोडा लिंबाचा रस व थोडं मध टाका. तुमच्या ओव्याचा चहा तयार आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

58 मिनिटे ago

आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीमार थांबवा; महाराष्ट्रात पोलीस राज खपवून घेणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पेपरफुटी प्रकरणावर न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेला कथित लाठीमार अन्यायकारक असून महाराष्ट्रात…

1 तास ago

सणसवाडीत ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; बॅरलमध्ये पाणी भरून कंपनीची दिशाभूल, दोन सराईत चोरटे अटकेत

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील झेनिथ बायोकेमिकल इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीतून तब्बल ८०० लिटर डिझेल…

6 तास ago

महाराष्ट्राला ‘समग्र शिक्षा’त अधिक निधी द्या; केंद्रीय परिषदेत दादाजी भुसे यांची जोरदार मागणी

मुंबई: देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी ८.६१ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असतानाही ‘समग्र शिक्षा’ योजनेच्या…

6 तास ago

विद्यार्थ्यांवर लाठीमार म्हणजे लोकशाहीवरील काळा डाग; हे विद्यार्थ्यांच्या जिवावर उठलेलं निष्ठूर सरकार; विजय वडेट्टीवार

सिंदेवाही: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध…

6 तास ago

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

23 तास ago