आरोग्य

हिवाळ्यात तुळशीचे दूध पिण्याचे फायदे

हिवाळ्याचा मोसम सुरू झाला आहे, अशात सर्दी, खोकला आणि ताप येण्याचा मोठा धोका असतो. अशा परिस्थितीत या मोसमात विशेष आहार आणि काळजी घेणे आवश्यक आहे. संसर्ग आणि फ्लू टाळण्यासाठी तुळशीचे सेवन करावे. यामुळे इम्‍यूनिटी स्ट्रॉंग होते तसेच मोसमी आजारांपासून बचाव देखील होतो. पण तुम्हाला हे माहीत आहे की तुळशीत दूध मिसळण्यामुळे या मोसमात तुमची प्रतिकारशक्ती देखील मजबूत राहते.

मायग्रेन

जर डोके खूप दुखत असेल तर तुळस आणि एक चिमूटभर हळद दुधात प्यायल्यास आराम मिळतो. जर कोणाला काही दिवसांनी सतत डोकेदुखी होऊ लागली असेल तर त्याने दररोज सकाळी तुळशी आणि दूध प्यावे. यामुळे त्या व्यक्तीला आराम मिळेल आणि लवकरच मायग्रेनसारखा आजार देखील दूर होईल.

रोगप्रतिकार शक्ती वाढते

तुळशीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडेंट असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. या दुधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीवायरल गुणधर्म आहेत, जे विषाणूजन्य ताप, सर्दी, खोकला बरे करण्यास उपयुक्त आहेत.

कर्करोगापासून बचाव तुळशीतही अनेक एंटीबायोटिक आणि एंटीऑक्‍सीडेंट गुणधर्म असतात आणि दुधामध्ये इतर सर्व पोषक घटक असतात, ज्यामुळे कर्करोग सारखा प्राणघातक आजार वाढत नाही.

ताण कमी होण्यास मदत

तुळशीच्या पानांमध्ये उपचार करण्याचे गुणधर्म असतात. जर आपण तणाव, नैराश्यासारख्या समस्यांनी त्रस्त असाल तर दररोज हे दूध प्या. डोकं शांत ठेवण्यासाठी याला गार करून पिणे फायदेशीर ठरेल. हे दूध मानसिक तणाव आणि चिंता कमी करण्यात मदत करत.

वजन कमी करा करण्यास फायदेशीर

जर तुम्हाला वजन वाढण्याची चिंता असेल तर तुळशीचे दूध पिण्यास सुरुवात करा. हे चयापचय वाढवते आणि वजन कमी करण्यास मदत करते. हे दूध श्वसनविषयक समस्या दूर करण्यात देखील उपयुक्त आहे.

तयार कसे करावे

प्रथम दीड ग्लास दूध उकळा. दूध उकळण्यास सुरवात झाली की त्यात 8 ते 10 तुळशीची पाने घाला आणि उकळी येऊ द्या. दूध जेव्हा एक ग्लास उरेल तेव्हा गॅस बंद करा. हे दूध कोमट प्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

19 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

19 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

19 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

21 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

1 दिवस ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

1 दिवस ago