आरोग्य

हिवाळ्यात ओलं खोबरं खाण्याचे फायदे

खोबऱ्याचा वापर रोज घराघरांमध्ये वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. खोबऱ्याने पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. आता हिवाळ्याला सुरूवात होणार आहे, अशात जर तुम्ही ओलं खोबरं नियमितपणे खाल तर तुमच्या आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. ओल्या खोबऱ्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. तसेच यात भरपूर आयर्न आणि फायबरही असतं. त्यासोबतच यात कॉपर, सेलेनियम, मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअमही भरपूर असतं.

१) मेंदुसाठी फायदेशीर: ओलं खोबरं खाऊन केवळ शरीरालाच नाही तर मेंदुला देखील अनेक फायदे मिळतात. यात आयर्न आणि व्हिटॅमिन बी६ आढळतं जे मेंदुची काम करण्याची क्षमता वाढवतं. तसेच स्मरणशक्तीही वाढते.

२) शुगरमध्ये फायदेशीर: ओल्या खोबऱ्याने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते. त्यामुळे डायबिटीसच्या रूग्णांनी याचा त्यांचा आहारात समावेश करावा.

३) त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर: ओल्या खोबऱ्यामध्ये व्हिटॅमिन्ससोबतच अनेक अ‍ॅंटी ऑक्सिडेंट्सही असतात. जे त्वचा आणि केसांना भरपूर पोषण देतात. यात आढळणारं व्हिटॅमिन ई त्वचा उजळवतं. तसेच याच्या सेवनाने केसांचा रखरखीतपणा दूर होते.

४) स्मरणशक्ती वाढते: हिवाळ्यात नियमितपणे ओलं खोबरं खाल्लाने स्मरणशक्ती वाढते. यासाठी खोबऱ्याच्या पेस्टमध्ये बदाम मिश्रित करुन रोज खावे. खोबऱ्यामध्ये गुड कोलेस्ट्रॉल अधिक प्रमाणात असतं जे तुमचं आरोग्य चांगलं ठेवतं.

५) पोट राहतं साफ: जर तुमचं पोट खराब झालं असेल तर ओल्या खाबऱ्याचा एक मोठा तुकडा रात्री खाऊन झोपा. सकाळी तुमचं पोट साफ होणार. यात फायबर अधिक प्रमाणात असल्याने यामुळे पोट साफ होतं.

६) उलटी होईल दूर: उन्हाळ्यात ओमोटींगची समस्या अनेकांना भेडसावते. वाढतं तापमान आणि घाम यामुळे असे होते. तुम्हाला जर ओमोटींग झाल्यासारखे वाटत असेल तर खोबऱ्याचा एक तुकडा खावा, याने तुम्हाला आराम मिळेल.

७) रोगप्रतिकार शक्ती वाढते: खोबऱ्याच्या सेवनाने इम्यून सिस्टम मजबूत होतं. यात अ‍ॅंटी बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी फंगल आणि अ‍ॅंटी व्हायरल तत्व असतात. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली; आम्ही ती वेगाने कनेक्ट केली; एकनाथ शिंदे

रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…

19 तास ago

पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा सत्ताधा-यांचा डाव; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…

19 तास ago

१०७ हुतात्म्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कुठे? कामगार, भाषा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…

21 तास ago

पत्नी खून प्रकरणात दत्तात्रय गायकवाड निर्दोष; परिस्थितीजन्य पुरावे ठरले अपुरे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…

21 तास ago

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

2 दिवस ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

2 दिवस ago