खाल्लेल्या पदार्थांचे नीट पचन न झाल्यास शरीराला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची कमतरता भासते. आपले शरीर पचन संस्थेवर आणि पचन क्रियेवर अवलंबून असते. निरोगी पचनसंस्था असलेल्या व्यक्तीचे शरीर निरोगी व सुदृढ असते. यासाठीच हिवाळ्याच्या दिवसांत जर तुम्ही तुमच्या मॉर्निंग रुटीनमध्ये थोडासा बदल करून काही आरोग्यदायी सवयीं लावल्या तर पचनक्रिया सुरळीत राहते.
हिवाळ्यात पचनशक्ती मजबूत ठेवण्यासाठी फॉलो करा ५ सवयी..
1) कोमट पाणी प्या: हिवाळ्यात, सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम कोमट पाणी प्यावे. त्यामुळे मालत्याग होऊन पोट साफ होण्यास अधिक मदत मिळते. रिकाम्या पोटी आधी कोमट पाणी प्यायल्यास ते संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर ठरते. कोमट पाणी प्यायल्याने चयापचय क्रियेचा वेग वाढतो आणि वजन कमी होण्यासही मदत होते.
२) हर्बल टी प्या: हिवाळ्यात, सकाळी उठल्यानंतर हर्बल टी जरुर प्यावा. जर तुम्ही दालचिनीचा चहा, ग्रीन टी किंवा इतर कोणताही हर्बल टी रिकाम्या पोटी प्यायला तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आपल्या शरीराला होतात. त्यामुळे कोमट पाणी प्यायल्यानंतर सगळयात आधी हर्बल टी प्या. यामुळे हिवाळ्यात शरीर उबदार राहण्यासही मदत होते शिवाय हर्बल टी प्यायल्याने पचनक्रियाही सुरळीत चालते.
3) आहारात फायबर आणि प्रोटिन्स घ्या: हिवाळ्यात नाश्ता किंवा जेवणात फायबर आणि प्रोटिन्सयुक्त पदार्थांचा अधिक जास्त समावेश करावा. पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी डाएटमध्ये प्रोटिन्स आणि फायबर दोन्ही घेणे आवश्यक आहे. प्रोटीन घेतल्याने तुम्हाला दिवसभरात पुन्हा पुन्हा भूक लागणार नाही. याव्यतिरिक्त, फायबर सूज येणे आणि आम्लता प्रतिबंधित करते.
४) हेव्ही नाश्ता करणे टाळा: हिवाळ्यात बहुतेकजण वारंवार भूक लागते म्हणून हेव्ही नाश्ता करतात. परंतु हे चुकीचे आहे. जर तुमची पचनक्रिया व्यवस्थित नसेल तर तुम्ही हेव्ही नाश्ता करणे टाळावे. नाश्त्यात जास्त तळलेले पदार्थ खाऊ नका. कारण यामुळे तुम्हाला दिवसभर ॲसिडिटी आणि पोट फुगण्याची समस्या सतावू शकते.
५) वॉकिंग किंवा एक्सरसाइज करा: हिवाळ्यात बरेचदा वातावरणातील गारठ्यामुळे आपण बाहेर वॉकिंग किंवा एक्सरसाइज करण्यासाठी जाणे टाळतो. परंतु असे न करता दिवसांतून किमान ३० मिनिटे वॉकिंग किंवा एक्सरसाइज करावा. यामुळे ॲसिडिटी आणि ब्लोटिंग सारख्या समस्या दूर होतील. याशिवाय शरीरात ऊर्जाही टिकून राहते.
(सोशल मीडियावरून साभार)
कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…
सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…