धूळ आणि प्रदूषण
गेल्या काही महिन्यांत मुंबईसह अनेक जिल्ह्यांतील हवेची गुणवत्ता पातळी घसरली आहे, प्रदूषण आणि धुळीचे प्रमाण वाढल्याने श्वसनविकाराच्या व्याधींमध्ये वाढ झाली आहे. अनेक नागरिकांना वारंवार खोकल्याचा त्रास होत आहे. औषधे घेतल्यानंतरसुद्धा हा त्रास कमी होत नाही. मोठ्या प्रमाणात रस्ते, इमारतीची बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे हवेत धूळ दिसून येते. हीच श्वास घेण्याच्या प्रक्रियेतून फुफ्फुसात जाते. यामुळे फुफ्फुसाला गंभीर इजा होण्याची शक्यता असते.
कबुतरांमुळे होतो ‘हा’ त्रास
कबुतरांना अनेकदा खायला देऊ नये. कबुतरखाने बंद करा, याबाबत नागरिक मागणी करतात. जेथे हे कबुतरखाने आहेत, त्या ठिकाणच्या नागरिकांना श्वसनविकाराचा आजार होतो.
कबुतरांच्या विष्ठेतून झालेल्या संसर्गामुळे श्वसनविकार वाढतो. कारण कबुतरांच्या विष्ठेत बुरशी, जिवाणू असतात. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे त्यांना हा फुफ्फुसाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.
या संसर्गामुळे फुफ्फुसाचा त्रास बळावतो, त्याचे रूपांतर लंग्स फायब्रोसिसमध्ये होण्याची शक्यता असते. त्यामुळे या आजारावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.
काय करू नये?
धूम्रपान करू नये.
धुळीच्या ठिकाणी मास्क घालावा
हा आजार अनुवंशिक आहे.
काय करावे?
संतुलित आहार घ्यावा.
नियमित व्यायाम करावा.
रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवा.
तर गुंतागुंत होऊ शकते
फुफ्फुस फायब्रोसिसमुळे रुग्णाला श्वासोच्छवास घेण्यास त्रास होतो. काम करताना उत्साह राहत नाही. या आजारावर औषधे आहेत. मात्र, एकदा का हा आजार झाला की, रुग्णाला दीर्घकालीन औषधे घ्यावी लागतात. आजार होऊ नये यासाठी जीवनशैली उत्तम ठेवणे, तसेच श्वसनाचा काही विकार झाल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. श्वसनविकारावर वेळीच उपचार केला नाही, तर गुंतागुंत होऊ शकते.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…