आरोग्य

रक्ताचा कॅन्सर समज आणि गैरसमज

रक्ताचा कॅन्सर आहे हे समजले तर अनेकजण वैद्यकीय उपचार घेण्यास तयार होत नाहीत, मात्र सर्वच प्रकारचे रक्ताचे कॅन्सर हे भितीदायक नसतात, काही प्रकारच्या कॅन्सरमध्ये पेशंट पूर्णपणे बरा होऊ शकतो.

लक्षणे

पांढऱ्या पेशी कमी होणे.

प्लेटलेटस् ची संख्या कमी होणे.

अंगावर गाठी येणे.

पांढऱ्या पेशींची संख्या वेगाने वाढणे.

हिमोग्लोबिन सतत कमी होणे.

खर्च किती येतो

रक्ताचा कॅन्सरमधील केमोथेरपी ही सहा ते आठ महिने चालते. एएमएल आणि एएलएल अशा दोन प्रकारच्या कॅन्सरच्या प्रकारातील वैद्यकीय उपचार सहा ते आठ महिने द्यावा लागतो. त्याचा खर्च पाच ते सहा लाखापर्यंत असतो. लिम्फोनिक हा एक रक्ताच्या कॅन्सरचा प्रकार आहे यात शरीरावर बाहेरून किंवा आतमध्ये गाठी येतात. त्यांची बायोप्सी करून त्याचे निदान केले जाते. रक्ताचा कॅन्सर हा प्राथमिक टप्प्यात कळला तर बरा होऊ शकतो. अनेकदा पेशंट डॉक्टरकडे वेळेत जात नाहीत. या पेशंटना टीबीची औषधे दिली जातात, त्यातून हा आजार बळावतो. म्हणूनच अशा पेशंटची योग्य वेळेत लिम्फ नोड बायोप्सी होणे गरजेचे आहे.

बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट स्टेम सेल थेरपी म्हणजे काय

या पेशंटमध्ये स्टेम सेल थेरपीचा वापर करण्यात येतो. रक्ताच्या कॅन्सरचे निदान करण्यासाठी बोन नॅरो अॅस्पिरेशन आणि बायोप्सी या तपासण्या हिप बोन्समधून तुकडा काढून तपासणीसाठी पाठवून केल्या जातात. ही तपासणी लोकल अॅनेस्थेशिया देऊन केली जाते. अनेकदा ही तपासणी करताना होणाऱ्या वेदनेच्या भीतीने पेशंटची मानसिक तयारी नसते. मात्र, या तपासणीमुळे रक्ताच्या कॅन्सरचे निदान योग्य वेळेत होण्यास मदत होते. वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरवर आता वैद्यकीय उपचार उपलब्ध असले तरीही रक्ताच्या कॅन्सरवर मात्र केमोथेरपी हाच एकमेव उपाय आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

7 तास ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

7 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

7 तास ago

7 तारखेपर्यंत पगार अनिवार्य; नोकरी सोडल्यानंतर 2 दिवसांत Full & Final, नवीन कामगार नियमांची माहिती

मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा,…

7 तास ago

प्रदीप कबरे यांच्या ‘खिडकी’ अभिवाचनाचा विशेष प्रयोग ३० जुलैला दादरच्या शिवाजी मंदिरात

मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या 'खिडकी' या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित…

7 तास ago

अपघातग्रस्त तरुणीला सुनेत्रा पवार यांची तात्काळ मदत; रुग्णालयात दाखल करून उपचाराची केली व्यवस्था

बारामतीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान थांबवला ताफा; जखमी तरुणीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…

7 तास ago