कॅल्शियम हाडांसाठी आवश्यक आहे असं बहुतेक लोकांना वाटतं, पण तसं नाही. कॅल्शियम हाडांपासून मेंदूपर्यंत काम करतं आणि आरोग्य चांगलं ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. आरोग्य तज्ञांच्या मते, पुरुषांपेक्षा महिलांना कॅल्शियमची कमतरता होण्याचा धोका जास्त असतो. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर काय होईल? यामुळे हाडांव्यतिरिक्त इतर अवयवांवर कसा होतो परिणाम.
आपल्या शरीरातील बहुतेक कॅल्शियम हाडांमध्ये असतं, परंतु रक्तामध्ये कॅल्शियमचं प्रमाण योग्य असणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असते, तेव्हा या स्थितीला हायपोकॅल्सीमिया असं म्हणतात. ही एक धोकादायक स्थिती आहे, कारण यामुळे लोकांना अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागतं. सामान्यत: कॅल्शियम हे अन्नपदार्थातून मिळतं, परंतु काही वेळा खाण्या पिण्यातून पुरेशा प्रमाणात कॅल्शियम न मिळाल्यास डॉक्टर सप्लिमेंट्सही देतात. यामुळे कॅल्शियमची लेव्हल नीट ठेवण्यास मदत होते.
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे स्नायू दुखणं, प्रचंड थकवा येणं, नखं आणि केस कमकुवत होणं, हाडं दुखणं आणि ब्रेन फॉग अशी लक्षणं दिसू लागतात. दीर्घकाळ कॅल्शियमची कमतरता असल्यास लोकांना चक्कर येऊ लागते आणि हाडांशी संबंधित ऑस्टिओपोरोसिस हा आजार होऊ शकतो. हा असा आजार आहे ज्यामुळे शरीर खूप कमकुवत होतं आणि चालायला त्रास होऊ लागतो. या आजारावर कोणताही अचूक उपचार नाही. कॅल्शियमच्या कमतरतेवर मात करण्यासाठी, दूध, दही, चीज, दही, ताक यासह सर्व दुग्धजन्य पदार्थांचे मोठ्या प्रमाणावर सेवन केलं पाहिजे. दूध हा कॅल्शियमचा चांगला सोर्स मानला जातो. याशिवाय हिरव्या भाज्या, कडधान्ये, बदाम, चिया सीड्स, तीळ, खसखस यासह अनेक शाकाहारी पदार्था मध्ये कॅल्शियम भरपूर असतं. कॅल्शियमच्या कमतरतेवर मात करण्यासाठी, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सप्लिमेंट्स देखील घेऊ शकता.
(सोशल मीडियावरून साभार)
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…