बऱ्याच वेळा अचानक रात्री पायात गोळे येतात, असह्य वेदना येतात. आणि काही केल्या बरं वाटतं नाही. तेव्हा आपण खालील उपाय केल्यास आराम पडेल नक्कीच.
1) एका वाटीत लिंबू रस काढून घ्या. हा रस पायाला चोळा. मग त्यांवर साधे मीठ चोळा आणि एका रुमालात खडे मीठ घालून तव्यावर गरम करून याची पुरचूंडी बांधून हळूहळू पाय शेका. या ३ गोष्टी एकत्र केल्यास पायात आलेले गोळे जातात. व आराम मिळतो.
२) एका वाटीत तिळाचे तेल घेऊन त्यात भिमसेन कापूर पावडर टाका आणि मिक्सिंग करून हे तेल पायांना लावून चोळावे. १५ मिनिटे करा हळूहळू गोळा निघून जाईल..
३) थोडा मऊ गूळ घ्या. यात सुंठ पावडर मिसळून घ्या आणि यांच्या बोरा इतक्या ७ गोळ्या करा आणि दररोज उपाशी पोटी सकाळी १ गोळी घ्या. असे ७ दिवस केल्यास कधीच पायात गोळे येणार नाही.
४) ४ बदाम, १ चमचा कच्चे तिळ आणि १ चमचा खडिसाखर एकत्र करून रोज सकाळी उपाशीपोटी १ महिना खावे. आयुष्यभर पायात गोळे येणार नाही..
५) १ पेलाभर दूधामध्ये १ चमचा नाचणीचे सत्त्व टाकून उकळून घ्या आणि यात ५ भिजवलेल्या काळ्या मनुका टाका व सकाळी उपाशीपोटी खा. असे १० दिवस करा.. शरीरात भरपूर कॅल्शियम तयार झाल्यामुळे पायात गोळे येणार नाही..
६) शेवग्याच्या शेंगांची भाजी, आठवड्यातून २ वेळा खा किंवा शेवग्याच्या शेंगांचे चूर्ण रोज जेवणानंतर घ्या. याने भरपूर प्रमाणात कॅल्शियम तयार झाल्यामुळे पायात गोळे येणार नाही.
७) रोज सकाळी २ डोंगरी आवळे अनशा पोटि खावे आणि दिवसातून एकदा केळं खावे.
८) जेव्हा आपल्या डाव्या पायाला गोळा येतो तेव्हा आपला उजवा हात उंच करा, जेव्हा आपल्या उजव्या पायात गोळे येतात तर आपला डावा हात उंच करा. तुम्हाला त्वरित बरं वाटेल.
(सोशल मीडियावरुन साभार)
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…