बऱ्याच वेळा अचानक रात्री पायात गोळे येतात, असह्य वेदना येतात. आणि काही केल्या बरं वाटतं नाही. तेव्हा आपण खालील उपाय केल्यास आराम पडेल नक्कीच.
1) एका वाटीत लिंबू रस काढून घ्या. हा रस पायाला चोळा. मग त्यांवर साधे मीठ चोळा आणि एका रुमालात खडे मीठ घालून तव्यावर गरम करून याची पुरचूंडी बांधून हळूहळू पाय शेका. या ३ गोष्टी एकत्र केल्यास पायात आलेले गोळे जातात. व आराम मिळतो.
२) एका वाटीत तिळाचे तेल घेऊन त्यात भिमसेन कापूर पावडर टाका आणि मिक्सिंग करून हे तेल पायांना लावून चोळावे. १५ मिनिटे करा हळूहळू गोळा निघून जाईल..
३) थोडा मऊ गूळ घ्या. यात सुंठ पावडर मिसळून घ्या आणि यांच्या बोरा इतक्या ७ गोळ्या करा आणि दररोज उपाशी पोटी सकाळी १ गोळी घ्या. असे ७ दिवस केल्यास कधीच पायात गोळे येणार नाही.
४) ४ बदाम, १ चमचा कच्चे तिळ आणि १ चमचा खडिसाखर एकत्र करून रोज सकाळी उपाशीपोटी १ महिना खावे. आयुष्यभर पायात गोळे येणार नाही..
५) १ पेलाभर दूधामध्ये १ चमचा नाचणीचे सत्त्व टाकून उकळून घ्या आणि यात ५ भिजवलेल्या काळ्या मनुका टाका व सकाळी उपाशीपोटी खा. असे १० दिवस करा.. शरीरात भरपूर कॅल्शियम तयार झाल्यामुळे पायात गोळे येणार नाही..
६) शेवग्याच्या शेंगांची भाजी, आठवड्यातून २ वेळा खा किंवा शेवग्याच्या शेंगांचे चूर्ण रोज जेवणानंतर घ्या. याने भरपूर प्रमाणात कॅल्शियम तयार झाल्यामुळे पायात गोळे येणार नाही.
७) रोज सकाळी २ डोंगरी आवळे अनशा पोटि खावे आणि दिवसातून एकदा केळं खावे.
८) जेव्हा आपल्या डाव्या पायाला गोळा येतो तेव्हा आपला उजवा हात उंच करा, जेव्हा आपल्या उजव्या पायात गोळे येतात तर आपला डावा हात उंच करा. तुम्हाला त्वरित बरं वाटेल.
(सोशल मीडियावरुन साभार)
नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…
ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…
शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…
मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…
आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…
खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…