आरोग्य

पित्त होण्याची कारणे व उपाय…?

आहार: तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ, लाल मांस, ह्या प्रकारचे अन्नपदार्थ आपण खाल्ले असतील तर हमखास पित्त होऊन छातीत जळजळ होते.

अपेय पान: आयुर्वेदात अपेय पान वर्ज्य सांगितले आहे. चहा, कॉफी, अल्कोहोल, निकोटिन युक्त पदार्थ म्हणजेच दारु, सिगारेट सतत सेवन केल्यास पित्त वाढते.

ऊन सहन न होणे: जर आपण तीव्र उन्हात काम करत असाल आणि तुमच्या शरीराला ऊन सहन झाले नाही तर शरीरातील पित्त वाढू लागते.

भावनिक ताण: कोणत्याही गोष्टीचा अति विचार करून भावनिक ताण तणाव आला असेल तर पित्त दोष उद्भवतो.

पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय…

अमृत फळ आवळा: चवीला तुरट असा आवळा कफ आणि पित्त प्रकोप कमी करणारा आहे. त्यामधील व्हिटॅमिन सी अन्ननलिका, पोट स्वच्छ ठेवते. पित्ताचा त्रास होत असेल तर कच्चा आवळा थोडे मीठ लावून खाऊ शकता. आवळ्याचे चूर्ण करून ते कोमट पाण्यातून घेऊ शकता. हा उपाय काही दिवस सकाळी केल्यास पित्त विकार कमी होतो.

मूग आणि तांदूळ: जर तुम्हाला पित्त झाल्याने भूक लागत नसेल किंवा जळजळ होत असल्याने काय खावं कोणता आहार घ्यावा हे समजत नसेल तर मुगाचं साधं वरण आणि भात त्यावर तूप घालून काही दिवस घ्यावा. मूग पित्तशामक आहे. तसेच साधा मूग आणि तांदळाचा नीर डोसा देखील खाऊ शकता. तिखट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.

उष्ण आल आणि रसदार लिंबू: आपल्या मनात येईल आलं उष्ण तिखट आहे पण पूर्वीपासून आल्याचा पित्तशामक म्हणून वापर होतो. आल्यातील तिखट पाचक रसाने वाढलेले आम्लपित्त कमी होते. लिंबाचा रस त्यातील व्हिटॅमिन सी मुळे पित्तशय स्वस्थ होते. जेवणात आलं घ्याव. तसेच आल्याचा तुकडा किसून मीठ, लिंबाचा रस, किंचित साखर घालून हे सरबत चमचाने थोडथोड पित राहावं.

कोकम: आमसूल किंवा कोकम काही घरात सहज उपलब्ध असते. त्यामधे देखील प्रचुर व्हिटॅमिन सी असते. कोकम सरबत किंवा आमसूल सेवन करून पित्त शमंत होते.

थंड दुध: थंड दुध वाढलेली जळजळ कमी करते. थोडेसे थंड दूध किंचित साखर घालून प्यायल्यास पित्त कमी होते. छाती आणि पोटातील जळजळ थांबते.

पिकलेले केळे: केळ्यातून शरीराला खूप जास्त पोटॅशियम मिळतं. त्यामुळे केळ खाल्ल्यास पोटातील आम्ल निर्मितीची प्रक्रिया मंदावते. तसेच शरीराल फायबर मिळते जे पचन क्रिया वेगवान करते.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अजितदादा पवारांच्या जयंतीनिमित्त २२ ते २६ जुलै ‘जनसेवा सप्ताह’

राज्यभर वृक्षारोपण, आरोग्य, महिला व शेतकरी उपक्रम मुंबई: स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे…

6 मिनिटे ago

मुंबईतील मृत्यूंवरून फडणवीस सरकारवर काँग्रेसचा हल्लाबोल; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुंबई: मुंबई परिसरात मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…

11 मिनिटे ago

FDA चा कृत्रिम दूध भेसळीच्या राज्यव्यापी रॅकेटवर मोठा घाव; पाच जिल्ह्यांत एकाच वेळी छापे

१.४७ कोटींचा मुद्देमाल जप्त; २० हजार लिटर संशयित दूध जागीच नष्ट, २६ आरोपींवर गुन्हा; १३…

18 तास ago

लुडो खेळाच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; आरोपीसह तिघांना अटक

अमरावती: अमरावती शहरात शनिवारी (४ जुलै) रात्री उशिरा लुडो खेळादरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भीषण…

21 तास ago

रांजणगाव MIDC मध्ये औद्योगिक शांततेसाठी पोलीस-उद्योग प्रतिनिधींची समन्वय बैठक संपन्न

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC परिसरातील औद्योगिक शांतता, कायदा व सुव्यवस्था, कामगार सुरक्षा तसेच…

23 तास ago

मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना महामार्ग बंद; नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

पुणे: राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग (एक्सप्रेसवे) आणि जुना पुणे–मुंबई महामार्ग या…

1 दिवस ago