डोकेदुखीचा त्रास अनेकांना सतत सतावत असतो. त्यातून त्वरित आराम मिळण्यासाठी औषधे घेण्याऐवजी साधे घरगुती उपाय करणे जास्त फायद्याचे ठरते. अनेक कारणांमुळे डोकं दुखतं. पित्ताचा त्रास असेल किंवा झोपेचा अभाव डोकं लगेच दुखायला लागत. आजकाल मोबाइल, लॅपटॉप पाहण्याचे प्रमाण खुप जास्त आहे त्यामुळे डोळ्यांना त्रास होतो आणि डोकही दुखत. काही साधे उपाय आहेत जे केल्याने डोकं दुखायच थांबेल.
१) कोमट पाण्यात अर्धा लिंब पिळायचा. असे पाणी दिवसातून दोन ते तीन वेळा प्या. पचनासाठी मदत होते आणि अपचनामुळे जर डोकं दुखत असेल तर आराम मिळतो. पोटातील गॅस कमी होतो आणि काही वेळातच डोकेदुख थांबते.
२) पेपरमिंट ऑइल डोकेदुखीवर अगदी प्रभावी असते. पेपरमिंटमधील मेन्थॉलमुळे रक्तवाहिन्या खुल्या होतात आणि थंडावा मिळतो. डोक्याला तेलाने चंपी करायची म्हणजे डोकं दुखणं थांबेल.
3) आलं आणि मध गरम पाण्यात घालायचे आणि प्यायचे. आल्याचे पाणी फार फायद्याचे ठरेल. तसेच आल्याचा किंवा सुंठीचा चहाही उपयुक्त ठरतो.
४) लवंग गरम करून रुमालात बांधून त्याचा वास घेणे किंवा तेलात लवंग गरम करुन त्या तेलाचा लेप कपाळावर लावल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो. हा घरगुती उपाय वर्षानुवर्षे चालत आला आहे.
५) शरीरातील कॅफेनचे प्रमाण जास्त झाल्यावरही डोकं दुखतं. त्यामुळे शरीरातील कॅफेनचे प्रमाण योग्य राहील एवढेच खावे. संतुलित ठेवा.
६) महिला अनेकदा केस धुतल्यावर ओले केस बांधतात. ओले केस बांधल्यामुळे डोकं प्रचंड दुखतं आणि केसांना वासही घाण येतो. त्यामुळे ओले केस अजिबात बांधू नका. पोकळीत केस व्यवस्थित वाळले की मग केस बांधायचे.
७) डिहायड्रेशनमुळे डोकं दुखतं. त्यामुळे दिवसभरात शरीराला जेवढे गरजेचे आहे तेवढे पाणी पिणे फार महत्त्वाचे असते. पाण्यात तुळस घालायची आणि तुळस पाणी प्यायचे. जास्त फायद्याचे ठरेल.
८) झोपेचे प्रमाण कमी जास्त झाल्यावर दिवसभर डोकं जड होतं. अति झोप चांगली नाही आणि अभावही. त्यामुळे झोप संतुलित असावी. लवकर झोपायचे आणि वेळेत उठायचे. असे केल्याने डोकेदुखीचे प्रमाण कमी होईल.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…
ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…
मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…
अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…
फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…