आरोग्य

रक्तदाब नियंत्रणासाठी आहार

सध्या आपल्या आयुष्यामध्ये बैठ्या कामामुळे काही आजार बळावत चालले आहेत. मधूमेह, डिप्रेशन, रक्तदाब आणि हृदयविकार असे हे आजार औषधाने कायमचे बरे होत नाहीत. त्यामुळे एक प्रकारची चिंता लागून राहते. मात्र हे सारे आजार लाईफ स्टाईल म्हणजे जीवन पध्दतीशी निगडित असल्यामुळे त्यांच्यातून सुटका करून घेण्याकरिता औषधे न वापरता जीवन पध्दतीत बदल केला की गुण येतो. एका अर्थाने ही गोष्ट सोपी आहे.

जीवन पध्दतीत करावयाच्या बदलामध्ये पहिला बदल असेल तो आहारातला. तेव्हा रक्तदाब नियंंत्रणात ठेवण्यासाठी कोणता आहार करावा हे एकदा माहीत करून घेतले आणि प्रत्यक्षात तसा आहार घेतला तर रक्तदाबावर बरेचसे नियंत्रण येते. आहारातला पहिला बदल म्हणजे फळे भरपूर खाणे. पोटॅशियम, फॉस्फरस इत्यादींचा भरपूर पुरवठा करणारी द्राक्षे रक्तदाबावर नियंत्रण ठेवू शकतात. द्राक्षांमुळे रक्तवाहिन्यांवरचा दाब कमी होतो. पोटॅशियमचा भरपूर पुरवठा करणारे दुसरे फळ म्हणजे केळी. केळी पॉटॅशियम शिवाय बी-६ आणि जीवनसत्त्व-क यांचा भरपूर पुरवठा करत असतात. त्यामुळे केळी खाण्याने सुध्दा रक्तदाब नियंत्रणात राहतो.

कांदा हे आपले नेहमीचे खाद्य. दररोजच्या दोन्हीही जेवणात सलग १५ दिवस कांदा खाल्ला तर त्याचा रक्तदाबावर झालेला परिणाम जाणवतो. कांद्याबरोबर लसूण सुध्दा रक्तवाहिन्यात साठलेले आणि रक्तवाहिन्याच्या आतल्या भिंतींवर चिकटून बसलेले कोलेस्टेरॉल मोकळे होते. तेव्हा लसणाच्या दोन पाकळ्या रोज नियमाने खाव्यात. रक्तप्रवाह वाहता राहतो, त्यातले अडथळे दूर होतात. शहाळे हे अनेक पोषणद्रव्यांचे आगार असते. त्यात सोडीयम, पोटॅशियम, कॅल्शियम, जीवनसत्त्व-क आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व द्रव्ये असतात. असेच एक दुसरे फळ म्हणजे टरबूज. टरबूज रक्तातल्या गुठळ्या कमी करते. कोथिंबीर रक्तातील साखर कमी करते, तर पुदीना हायपरटेंशन कमी करते. लिंबू तर सर्व दृष्टीने उपयुक्त असते.

(सोशल मिडीयावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

3 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

4 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

4 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

4 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

5 तास ago

अवैध सावकारांनी खरेदी खत करून घेतली असल्यास नागरिकांनी निर्भयपणे तक्रारी कराव्यात…

रांजणगाव गणपती : निर्मलग्राम ग्रामपंचायत रांजणगाव गणपती यांच्या वतीने तसेच सामाजिक कार्यकर्ते शिवाजी बबन खेडकर…

6 तास ago