म्हशीचं दूध घट्ट आणि गायीचं दूध पातळ असतं. गायीच्या दुधात म्हशीच्या दुधाच्या तुलनेनं चार टक्क्यांपर्यंत कमी फॅट्स असतात. गायीच्या दुधात ३-४% फॅट्स असतात, तर म्हशीच्या दुधात ७-८% फॅट्स असतात. त्यामुळेच म्हशीचं दूध पचण्यासाठी जड असतं. याच्या तुलनेत गायीचं दूध पचायला हलकं असतं.
गायीच्या दुधात पाण्याचं प्रमाण अधिक असतं. नवजात बालकांना कुठल्याही कारणांनी आईचं दूध मिळत नाही, पिता येत नाही; अशा बाळांना गायीचं दूध पाजलं जातं.
आहार नियंत्रण बाबत विचार कराल, तर गायीचं दूध प्यावं, आणि जर वजन वाढवायचं आहे आणि अशक्तपणा असेल तर म्हशीचं दूध प्यावं. गायीचं दूध पातळ असतं आणि यात जवळपास ८८% पाणी असतं. हेच कारण आहे की गायीचं दूध पचायला हलकं असतं. तर म्हशीच्या दुधात पाण्याचं प्रमाण हे ७०% पर्यंत असतं.
शरीराला प्रोटीनची कमतरता असेल, तर म्हशीचं दूध प्यावं. गायीच्या दुधाच्या तुलनेत म्हशीच्या दुधात १० ते ११% अधिक प्रोटीन असतं. प्रोटीन मुळेच म्हशीचं दूध हे हीट रेजिस्टंट असतं आणि यामुळेच आजारी, वृद्ध आणि नवजात बाळांना म्हशीचं दूध देऊ नये.
म्हशीच्या आणि गायीच्या दुधातील फरक म्हणजे कोलेस्ट्रॉल. म्हशीच्या दुधात गायीच्या दुधाच्या तुलनेनं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी असतं. म्हणून म्हशीचं दूध हाय बीपी, कोलेस्ट्रॉल, किडनीचे आजार असलेल्या व्यक्तींनी अवश्य प्यावं.
म्हशीच्या दुधात प्रोटीन आणि फॅट्स दोन्ही जास्त असतात. तर गायीच्या दुधात हे दोन्ही कमी असतात. एक कप म्हशीच्या दुधातून २७३ कॅलरीज मिळतात, तर १ कप गायीच्या दुधातून १४८ कॅलरीज मिळतात.
म्हशीचं दूध प्यायल्या नंतर शांत झोप येत नाही, तर गायीचं दूध झोपण्यापूर्वी प्यायल्यानं चांगली झोप लागते.
म्हशीच्या दुधापासून बनवलेलं पनीर, खवा, दही, खीर, कुल्फी, तूप अधिक चविष्ट होतं. तर गायीच्या दुधापासून बनवलेले हे पदार्थ वजन कमी करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरतात.
कॅल्शिअमचं प्रमाण म्हशीच्या दुधात अधिक असते. तर गायीच्या दुधात पोटॅशिअम आणि सोडिअमचं प्रमाण कमी असतं, म्हणून लहान मुलांना आणि हाय ब्लडप्रेशन असणाऱ्यांना गायीचं दूध फायदेशीर असतं.
गायीचं दूध पित्तशामक असतं आणि पचनक्रिया सुधारतं. तर म्हशीचं दूध पचायला जड असतं, म्हणून त्यापासून बनवलेलं तूप हे कफ आणि पित्तकारक असतं.
जर तुम्हाला कुठलाही त्रास नाही आणि वजनही कमी आहे, तर मग म्हशीचं दूध पिणं फायदेशीर ठरतं.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई : देशातील तपास यंत्रणा, न्यायप्रक्रिया आणि उद्योगविश्व यांच्यातील संबंधांवर सध्या मोठी चर्चा सुरू असून,…
मुंबई: बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गोवंशाच्या अवैध वाहतुकीविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. परिवहन…
औरंगाबाद: ग्रामीण भागातील गरीब, शेतकरी, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना स्वतःचे हक्काचे पक्के घर मिळावे,…
काही लोकांच्या मानेवर काळे डाग आणि चामखीळ असतात. जास्तीत जास्त लोक या काळ्या डागांना मळ…
अनेक लोक पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी सहलीचे नियोजन करत आहेत. हिरवागार निसर्ग जणू आपल्याला त्याच्याकडे बोलावूनच…
दहा दिवसांत तिसऱ्यांदा दरवाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ नवी दिल्ली: देशभरातील नागरिकांना महागाईचा आणखी एक मोठा…