आरोग्य

पचनक्रिया वाढवणारे सूप

अयोग्य आहार, खाण्याच्या चुकीच्या पद्धती, बाहेरचे पदार्थ खाणे, व्यायामाचा अभाव, ताणतणाव, आदी कारणांमुळे पोटाच्या तक्रारी वाढण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. पोटाच्या तक्रारी टाळायच्या असतील तर वरील गोष्टींचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. पोट बिघडले म्हणून सतत औषध घेणे चांगले नसून त्याचे साईड इफेक्टही होऊ शकतात. अशी समस्या उद्भवल्यास घरच्या घरी उपचार करणे चांगले आहे. पचायला हलके, व्हिटॅमिन्स, फायबर्स, प्रोटीनयुक्त सूप घेतले तर ही समस्या सुटू शकते.

१) पालक पनीर सूप

तेलावर कांदा आणि लसूण परतून त्यावर पालकची पेस्ट टाका. थोडे किसलेले पनीर टाकून हे मिश्रण चांगले उकळवून घ्या.

२) लाल भोपळ्याचे सूप

लाल भोपळ्याचे तुकडे, कांदा, लाल मिरच्या, आले, लसूण पेस्ट, भाजलेले जिरे, हे सर्व दोन कप पाण्यात प्रेशर कूकरमध्ये १० मिनिटे हे मिश्रण शिजवा. कूकर थंड झाल्यानंतर सर्व मिश्रण भांड्यात काढून पेस्ट करा. हे सूप घेतल्यास पचनक्रिया सुधारते.

३) दालचिनी, टोमॅटो सूप

चिरलेला कांदा, टोमॅटो उकळत्या पाण्यात टाकून नंतर लसूण, अक्रोडचे काप, भाज्या टाका. एक उकळी आल्यानंतर हे मिश्रण चांगले घोटून घ्या. यामध्ये मिरपूड, दालचिनीची पावडर टाका. पिण्याअगोदर एकदा गरम केले तरी चालेल.

४) गाजर, कोथिंबिर सूप

गाजर वाफवून त्याची पेस्ट करून घ्या. त्यामध्ये कोवळ्या कोथींबीरीचे देठ, सेलेरीचे देठ, किसलेले आले टाका आणि कोमट झाल्यावर सूप प्या.

५) लिंबू, कोेथिंबीर सूप

भाज्यांचे काप पाण्यात उकळवून त्यामध्ये मिरपूड, लवंग टाका. नंतर कोथिंबीरीची पाने व लिंबाचा रस टाका. संध्याकाळी हे सूप घेतल्यास अधिक लाभदायक ठरते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

4 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

8 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

8 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

8 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

8 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

8 तास ago