आरोग्य

गुडघेदुखीचा त्रास सतावतो? घरीच करा ‘हे’ खास तेल

गुडघेदुखीचा त्रास हा फारच कॉमन पण तितकाच त्रासदायक देखील ठरतो. गुडघेदुखीची समस्या ही विशेषतः वृद्ध व्यक्तींमध्ये, तसेच सतत उभं राहणाऱ्या किंवा शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्तींमध्ये फार मोठ्या प्रमाणावर आढळून येते. दीर्घकाळ उभं राहणं, वजन वाढ, वाढतं वय, संधिवात किंवा स्नायूंवरील ताण यामुळे गुडघ्यांमध्ये वेदना जाणवते. या वेदनांवर कायमस्वरूपी उपाय शोधणं अनेकांसाठी आवश्यक असते.

गुडघेदुखीवर आपण घरच्याघरीच अनेक घरगुती उपाय देखील करु शकतो. या उपायांपैकीच सगळ्यांत सोपा आणि सर्वोत्तम असा घरगुती उपाय म्हणजे घरगुती पद्धतीने बनवलेले औषधी तेल. अशा प्रकारच्या घरगुती तेलामध्ये वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक घटकांमध्ये वेदनाशामक, सूज कमी करणारे आणि उष्णता नियंत्रित करणारे गुणधर्म असतात. अशा घरगुती तेलाचा रोज वापर केल्याने गुडघ्यांची दुखणी हळूहळू कमी होतात आणि सांध्यांमध्ये लवचिकता येते.

तीळाचे तेल, लसूण पाकळ्या, ओवा, लवंग, मोठी वेलची, सुंठ पावडर, जायफळ पावडर यांसारखे नैसर्गिक घटक वापरून तयार केलेले तेल सांध्यांवर चोळल्यास वेदना कमी होतात, सूज उतरते आणि गुडघेदुखी कमी होते.

गुडघेदुखीसाठी घरच्याघरीच तेल कसं तयार करायचं ते पाहूयात.  

साहित्य

१. तीळाचे तेल – १ कप

२. लसूण पाकळ्या – ७ ते ८ लसूण पाकळ्या

३. ओवा – १ टेबलस्पून

४. लवंग – ४ ते ५ लवंग काड्या

५. मोठी वेलची – १ मोठी वेलची

६. सुंठ पावडर – १/२ टेबलस्पून

७. जायफळ पावडर – १/२ टेबलस्पून

कृती 

१. एका मोठ्या भांड्यात तिळाचे तेल घेऊन त्यात लसूण पाकळ्या, ओवा, लवंग, मोठी वेलची, सुंठ पावडर, जायफळ पावडर असे सगळे जिन्नस घालावेत.

२. आता गॅसच्या मध्यम आचेवर हे भांड ठेवून तेल हळूहळू चमच्याने ढवळत राहून उकळवून घ्यावे.

३. तेलाचा रंग बदलून हलकासा सोनेरी होईपर्यंत तेल चांगले उकळवून घ्यावे.

४. आता तेल थोडे थंड होऊ द्यावे तेल थंड झाल्यावर ते बारीक जाळीदार गाळणीने गाळून घ्यावे.

५. गाळून घेतलेले तेल एका काचेच्या बाटलीत भरून स्टोअर करुन ठेवावे.

या तेलाचा वापर कसा करावा

रोज रात्री झोपण्यापूर्वी हे तेल एका वाटीत घेऊन हलकेसे गरम करावे. या गरम तेलाने गुडघ्याची मालिश करावी. हा उपाय दररोज केल्यास गुडघेदुखी कमी होण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पावसाळ्यात डायरियाचा वाढतो धोका, आधीच ‘या’ टिप्स फॉलो कराल तर बिघडणार नाही तब्येत

पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे…

2 तास ago

पावसाळ्यातील या ५ भाज्या चुकूनही खाऊ नका

पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागते. कारण या ऋतूमध्ये अनेक आजार डोकं वर काढतात. चुकीच्या…

2 तास ago

मोठी स्वप्ने पाहा, जिद्द आणि मेहनतीने यश मिळवा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

ठाणे: ठाणे महापालिका शाळा क्रमांक २३ येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या दिवशी आयोजित शाळा प्रवेशोत्सव…

2 तास ago

विठ्ठल मंदिरातील भाविकांच्या सुविधा आणि नागरिकांच्या हक्कांसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार; नीलम गोऱ्हे

पंढरपूर: शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रविवारी पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी…

2 तास ago

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसची ‘ReelSeRealTalk’ रील स्पर्धा

मुंबई: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई प्रदेश युवक काँग्रेसतर्फे ‘#ReelSeRealTalk’ या विशेष…

2 तास ago

महाराष्ट्राची शेती! संकट, वास्तव आणि भविष्यातील दिशा

मुंबई: महाराष्ट्र हा संत, समाजसुधारक आणि कष्टकरी शेतकऱ्यांचा प्रदेश आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आजही शेतीच…

3 तास ago