आरोग्यासाठी अन्न किती महत्वाचे आहे हे सर्वांना माहीत आहे. प्रत्येक गोष्ट खाण्याची योग्य वेळ असते. रिकाम्या पोटी कोणतेही आम्लयुक्त अन्न आतड्याच्या अस्तरावर परिणाम करते आणि यामुळे संसर्गाचा धोका असतो. आरोग्य तज्ञ विशेषतः काही पदार्थ रिकाम्या पोटी खाण्यास प्रतिबंधित करतात. अशाच काही पदार्थांबद्दल जाणून घेवूया.
बराच वेळ झोपल्यानंतर जेव्हा तुम्ही जागे होता तेव्हा पचनसंस्था काम करू लागते, परंतु त्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे आणि उठल्यानंतर किमान २ तासांनी नाश्ता केला पाहिजे. आता असे कोणते पदार्थ आहेत जे रिकाम्या पोटी खाऊ नयेत, ते जाणून घेऊया.
१) मसालेदार जेवण: रिकाम्या पोटी मसाले आणि मिरच्या खाल्ल्याने पोटाच्या अस्तराला त्रास होतो, ज्यामुळे आम्लीय प्रतिक्रिया आणि पोटात मुरडून येते. मसाले तिखट असतात, जे अपचन वाढवू शकतात. त्यामुळे सकाळी तिखट आणि मसालेदार पदार्थ टाळा. बरेच लोक समोसे, कचोरी, पकोडे इत्यादींचे सेवन करतात. सकाळच्या नाश्त्यात ते टाळा.
२) ज्यूस: आपल्यापैकी अनेकजण दिवसाची सुरुवात करण्यासाठी एक ग्लास फळांचा ज्यूस घेतात. परंतु हे अजिबात चांगले नाही कारण रिकाम्या पोटी ज्यूस पिल्याने पचनशक्तीवर विपरीत परिणाम होतो जे शरीरासाठी चांगले नाही.
३) दही: दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते, जे पोटातील अॅसिडिटी पातळीला त्रास देते. तसेच, रिकाम्या पोटी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने त्यातील लॅक्टिक अॅसिड पोटातील चांगले बॅक्टेरिया नष्ट करते, ज्यामुळे अॅसिडिटी वाढते, त्यामुळे सकाळी दही खाऊ नये.
4) नाशपती: नाशपतीमध्ये आढळणारे क्रूड फायबर पोटाच्या नाजूक अस्तराचे नुकसान करते. तसेच, नाशपती रिकाम्या पोटी खाल्ल्यास पोटदुखी होऊ शकते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन टाळा. जर खायचे असेल तर सकाळी उठल्यानंतर २ तासांनी ओट्स किंवा दलिया सोबत खाऊ शकता.
5) आंबट फळे: योग्य वेळी खाल्ल्यासच फळे आरोग्यासाठी चांगली ठरतात. आंबट फळे रिकाम्या पोटी खाल्ल्याने अॅसिडचे उत्पादन वाढू शकते. फळांमध्ये भरपूर फायबर आणि फ्रक्टोज असते, जे रिकाम्या पोटी खाल्ल्यास पचनक्रिया मंदावते.
6) कॉफी: दिवसाची सुरुवात एक कप कॉफीने करणे सामान्य आहे. रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने अॅसिडिटी होऊ शकते. रिकाम्या पोटी तिचे सेवन केल्याने पचनसंस्थेमध्ये हायड्रोक्लोरिक अॅसिडचे उत्पादन वाढू शकते, ज्यामुळे काहींना पोटाचा त्रास होऊ शकतो, म्हणून रिकाम्या पोटी काॕफी पिने टाळा.
(सोशल मीडियावरुन साभार)
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…
मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…
मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी राष्ट्रपिता Mahatma Gandhi यांच्या हत्येचे समर्थन…
मुंबई: मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सुप्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार (वय ७५ वर्षे) यांचे दीर्घ…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…