आरोग्य

रिकाम्या पोटी चुकुनही हे खाऊ नका, आरोग्यास आहे हानिकारक

आरोग्यासाठी अन्न किती महत्वाचे आहे हे सर्वांना माहीत आहे. प्रत्येक गोष्ट खाण्याची योग्य वेळ असते. रिकाम्या पोटी कोणतेही आम्लयुक्त अन्न आतड्याच्या अस्तरावर परिणाम करते आणि यामुळे संसर्गाचा धोका असतो. आरोग्य तज्ञ विशेषतः काही पदार्थ रिकाम्या पोटी खाण्यास प्रतिबंधित करतात. अशाच काही पदार्थांबद्दल जाणून घेवूया.

बराच वेळ झोपल्यानंतर जेव्हा तुम्ही जागे होता तेव्हा पचनसंस्था काम करू लागते, परंतु त्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे आणि उठल्यानंतर किमान २ तासांनी नाश्ता केला पाहिजे. आता असे कोणते पदार्थ आहेत जे रिकाम्या पोटी खाऊ नयेत, ते जाणून घेऊया.

१) मसालेदार जेवण: रिकाम्या पोटी मसाले आणि मिरच्या खाल्ल्याने पोटाच्या अस्तराला त्रास होतो, ज्यामुळे आम्लीय प्रतिक्रिया आणि पोटात मुरडून येते. मसाले तिखट असतात, जे अपचन वाढवू शकतात. त्यामुळे सकाळी तिखट आणि मसालेदार पदार्थ टाळा. बरेच लोक समोसे, कचोरी, पकोडे इत्यादींचे सेवन करतात. सकाळच्या नाश्त्यात ते टाळा.

२) ज्यूस: आपल्यापैकी अनेकजण दिवसाची सुरुवात करण्यासाठी एक ग्लास फळांचा ज्यूस घेतात. परंतु हे अजिबात चांगले नाही कारण रिकाम्या पोटी ज्यूस पिल्याने पचनशक्तीवर विपरीत परिणाम होतो जे शरीरासाठी चांगले नाही.

३) दही: दह्यामध्ये लॅक्टिक अ‍ॅसिड असते, जे पोटातील अ‍ॅसिडिटी पातळीला त्रास देते. तसेच, रिकाम्या पोटी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने त्यातील लॅक्टिक अ‍ॅसिड पोटातील चांगले बॅक्टेरिया नष्ट करते, ज्यामुळे अ‍ॅसिडिटी वाढते, त्यामुळे सकाळी दही खाऊ नये.

4) नाशपती: नाशपतीमध्ये आढळणारे क्रूड फायबर पोटाच्या नाजूक अस्तराचे नुकसान करते. तसेच, नाशपती रिकाम्या पोटी खाल्ल्यास पोटदुखी होऊ शकते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन टाळा. जर खायचे असेल तर सकाळी उठल्यानंतर २ तासांनी ओट्स किंवा दलिया सोबत खाऊ शकता.

5) आंबट फळे: योग्य वेळी खाल्ल्यासच फळे आरोग्यासाठी चांगली ठरतात. आंबट फळे रिकाम्या पोटी खाल्ल्याने अ‍ॅसिडचे उत्पादन वाढू शकते. फळांमध्ये भरपूर फायबर आणि फ्रक्टोज असते, जे रिकाम्या पोटी खाल्ल्यास पचनक्रिया मंदावते.

6) कॉफी: दिवसाची सुरुवात एक कप कॉफीने करणे सामान्य आहे. रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने अ‍ॅसिडिटी होऊ शकते. रिकाम्या पोटी तिचे सेवन केल्याने पचनसंस्थेमध्ये हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिडचे उत्पादन वाढू शकते, ज्यामुळे काहींना पोटाचा त्रास होऊ शकतो, म्हणून रिकाम्या पोटी काॕफी पिने टाळा.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कुणबी प्रमाणपत्र वाटपामागे कोणाचा दबाव? विजय वडेट्टीवारांचा सरकारला सवाल

ओबीसी आरक्षण, मोहन भागवतांचा युवक संवाद आणि आदिवासी विभागाच्या ६०० कोटींच्या थकीत देण्यांवरही सरकारवर हल्लाबोल…

2 मिनिटे ago

मुंबईच्या पुनर्विकासाला गती; झोपडपट्टी पुनर्वसन, गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांवर सरकारचा भर

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत झोपडपट्टी पुनर्विकास, परवडणारे गृहनिर्माण, स्वच्छता आणि आधुनिक पायाभूत सुविधा…

9 मिनिटे ago

‘ज्ञानाचा महासागर हरपला’; डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी; एकनाथ शिंदे

कोल्हापुरात पार्थिवाचे घेतले अंतिम दर्शन; शिक्षण, समाजसेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाला भावपूर्ण श्रद्धांजली कोल्हापूर :…

14 तास ago

पुणे–नाशिक सरळ रेल्वेसाठी तज्ज्ञ समिती स्थापन; सत्यजीत तांबे यांनी केला निर्णयाचे स्वागत

६० दिवसांत अहवाल सादर होणार; ९ ऑगस्टचे जनआंदोलन नियोजितप्रमाणेच होणार मुंबई: पुणे–नाशिक सरळ रेल्वे प्रकल्पाच्या…

14 तास ago

घोडनदी बार असोसिएशनची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात; बोगस मतदान झाल्याचा गंभीर आरोप

निवडणूक प्रक्रिया रद्द करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी; चौकशी पुर्ण होईपर्यंत निकाल व पुढील प्रक्रिया…

14 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे; सुनिल तटकरे यांच्याकडून नियुक्ती जाहीर

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय…

18 तास ago