आरोग्य

मेंदू आजारी पडण्यापूर्वी रोज करा या ५ गोष्टी

मेंदूची काळजी घेणे फार गरजेचे असते. मेंदू दमतो, शिणतो. ब्रेन फॉग हा शब्द तर आपण हल्ली सतत वापरतो. बिचारा मेंदू चोवीस तास काम करतो आणि त्याची काळजी मात्र आपण करत नाही.

१) रोजच्या रोज बुद्धीला चालना मिळायला हवी. त्यासाठी वाचन करा, शब्दकोडे सोडवा तसेच नवीन भाषा शिका. इतरही कौशल्ये शिका. मेंदूला चालना मिळत राहिली पाहिजे नाहीतर त्याची क्षमता कमी होते. त्याचा वापर सतत करायचा.

२) दिवसातून किमान अर्धा तासासाठी व्यायाम करायला हवा. व्यायाम केल्यावर रक्त वाहिन्याचे काम सुरळीत होते. त्यासाठी चालणे, सायकल चालवणे, एखादा खेळ खेळणे अशा कृती करा. व्यायाम करणे फार गरजेचे असते. शरीरासाठी आणि मानसिक तसेच बौद्धिक आरोग्यासाठीही.

३) आहार चांगला सात्विक आणि योग्य असणे फार गरजेचे आहे. आपण जे खातो त्याचा शरीरावर मनावर तसेच बुद्धीवरही परिणाम होतो. पोषण देणारे आणि पोटाला आराम देणारे पदार्थ आहारात असावेत. ओमेगा-३ असलेले अन्न खावे. त्यामुळे पोटाला आधार आणि मेंदूला चालना मिळते.

४) रक्तदाबाचा त्रास अनेकांना असतो. हा त्रास एकदा सुरु झाला की त्याचा मेंदूच्या कार्यावरही परिणाम होतो. त्यामुळे रक्तदाबाचा त्रास होणारच नाही आणि झालाच तर तो आटोक्यात कसा राहील यासाठी उपाय करायचे. रक्तदाबावर नियंत्रण ठेवायचे. कायम काळजी घ्यायची. वेळोवेळी तपासणीला जायचे.

५) शुगर म्हणजेच मधुमेह असेल तर काळजी घ्या. बौद्धिक क्षमता चांगली राहावी यासाठी इतरही अवयव आणि संपूर्ण आरोग्य चांगले राहणे गरजेचे असते. स्मरणशक्तीसाठी गरजेच्या असणाऱ्या कृती मधुमेहामुळे संथावतात. त्यामुळे हा त्रास मेंदूवर परिणाम करतो.

६) व्यसन अजिबात करु नका. व्यसनाचा मेंदूवर भयंकर परिणाम होतो. मेंदूच्या क्रियांवर प्रचंड परिणाम होतो. तसेच विचार क्षमता संथ होते. मेंदूच्या कामात अडथळा येतो. त्याचा परिणाम इतरही शारीरिक कृतींवर होतो.

७) ताणतणाव, मानसिक त्रास, अतिविचार असे प्रकार आजकाल अगदीच सामान्य झाले आहेत. मात्र सतत तणावात राहणे मेंदूसाठी चांगले नाही. भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. तसेच झोपही पूर्ण घ्यायलाच हवी. झोप कमी झाल्यामुळे मेंदू थकतो. त्याचे काम व्यवस्थित होत नाही.

८) मेंदूच्या आरोग्यासाठी आनंदी राहणे गरजेचे आहे. त्यासाठी चांगले मित्र आयुष्यात असावेत. एखादा छंद असावा. मन रमवता यायला हवे. मन प्रसन्न आणि हृदय आनंदी असेल तर मेंदू आणखी तल्लख होतो. विचार स्पष्ट राहतात आणि आकलन शक्तीही चांगली राहते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; अरणगावच्या निकिताचा संघर्ष यशस्वी; मुंबई लोहमार्ग पोलीस दलात नियुक्ती

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…

9 तास ago

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

1 दिवस ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

1 दिवस ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

1 दिवस ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

1 दिवस ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

1 दिवस ago