आरोग्य

आतड्याच्या आरोग्याविषयी तुमच्याही मनात ‘हे’ गैरसमज आहेत का

आपले आरोग्य सुधारण्यासाठी इंटरनेटवर बरेच हॅक सांगितले जातात. त्यात खासकरून आतड्याच्या आरोग्याला अधोरेखित केले जाते. तर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत सांगितले जाणारे बरेच हॅक पाहून आपणसुद्धा असे करून बघायचे का, असा प्रश्न एकदा तरी आपल्या मनात येतोच.

प्रोबायोटिक्सचा प्रचार आतड्याच्या आरोग्यासाठी केला जातो. पण, प्रोबायोटिक्स घेणे प्रत्येकासाठी योग्य नसते. खरं तर, प्रोबायोटिक्सचा ताण आल्याने तुमची लक्षणे बिघडू शकतात. त्यामुळे प्रोबायोटिक्स घेताना तज्ज्ञांच्या मते दोन प्रमुख घटक तुम्ही पाहिले पाहिजेत. प्रोबायोटिकमध्ये साखर किंवा कृत्रिम स्वीटनर जोडले आहे का? यापैकी एकही गोष्ट त्यात असेल, तर त्यामुळे तुमच्या आतड्यातील मायक्रोबायोटा विस्कळित होईल.

प्रोबायोटिक ॲसिड प्रतिरोधक आहे का? जर ते आम्ल प्रतिरोधक नसेल, तर ते पोटातून जात नाही आणि आतड्यांपर्यंत पोहोचत नाही. मोठ्या आतड्यात बहुतेक सूक्ष्म जीव राहतात. त्याऐवजी प्रोबायोटिक्ससारखे ग्रीक योगर्ट किंवा केफिरसारखे पारंपरिक आंबवलेले पदार्थ खा.

२) १५ दिवसांचे डिटॉक्स किंवा क्लीन्स / गट हिलिंग प्रोटोकॉल

या गोष्टी तुम्हाला उत्साही किंवा प्रभावी उपाय देणाऱ्या वाटू शकतात. पण, मीनू बालाजी यांनी निदर्शनास आणले की, ते मूळ कारणाकडे लक्ष देत नाहीत. १५ दिवसांचे डिटॉक्स केल्यानंतर ऊर्जेच्या बाबतीत सुधारणा वाटू शकते आणि तुम्हाला हलकेसुद्धा वाटू शकते. तरीही यामुळे तुम्हाला चक्कर येणे, कमी उत्साही किंवा तुमचे स्नायू कमी होऊ शकतात आदी समस्या जाणवू शकतात. चांगल्या आरोग्यासाठी तुम्हाला स्नायू टिकवून ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे मानवी शरीरातील अवयव जसे की यकृत, मूत्रपिंड हे डिटॉक्स करण्यासाठी सुसज्ज आहेत आणि आपल्याला निरोगी ठेवतात, असेही त्या म्हणाल्या.

३) वनस्पती-आधारित आहारामुळे आतड्याचे आरोग्य नेहमीच सुधारू शकत नाही

अधिक वनस्पती-आधारित पदार्थ खाणे हे आतड्याच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. पण, जर तुम्हाला ॲसिडिटी, अपचन किंवा पोट फुगणे यांसारख्या पचनाच्या समस्या असतील, तर जास्त प्रमाणात फायबर खाल्ल्याने परिस्थिती आणखी बिघडू शकते. मीनू बालाजी यांनी निदर्शनास आणून दिले की, काही वनस्पती-आधारित पदार्थ पचायला जड असतात. त्याशिवाय, जर शाकाहारी आहार योग्यरीत्या संतुलित केला नाही, तर अनेक पौष्टिक कमतरता जाणवू शकते. म्हणून आतड्याचेआरोग्य सुधारण्यासाठी पूर्णपणे शाकाहारी राहणे प्रत्येकाला नेहमीच मदत करू शकत नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

4 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

4 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

4 तास ago

कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक, वीरपत्नी व वीरमातांचा कृतज्ञता सन्मान; सरकार सदैव सोबत; सुनेत्रा पवार

मुंबई: कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्य सरकार…

4 तास ago

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून; मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, शिक्रापूर पोलिसांनी काही तासांत उकलले गूढ

अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटने गळा दाबून केली हत्या; पत्नीसह अटक शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर येथील…

15 तास ago

हेडऐवजी टेलपासून कालव्याचे अस्तरीकरण; शिरूरच्या शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप, आंदोलनाचा इशारा

आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार…

18 तास ago