आरोग्य

अन्न घाईघाईने खाल्ल्याने वजन वाढतं का

घरातील मोठे लोक आपल्याला बालपणीच शिकवतात की, अन्न चांगलं बारीक चावून चावून खाल्लं पाहिजे. तर आयुर्वेदानुसार, एक घास ३२ वेळा चावून खाल्ला पाहिजे. अन्न व्यवस्थित चावून खाल्लं तर पचन चांगलं होतं. तसेच त्यातील पोषक तत्वही शरीरात अवशोषित होतात. पण बरेच लोक घाईघाईत जेवण करतात ते अन्न व्यवस्थित चावून खात नाहीत. जे शरीरासाठी खूप नुकसानकारक ठरतं. इतकंच नाही तर अन्न व्यवस्थित चावून खाल्लं गेलं नाही तर वजनही वाढू शकतं.

घाईघाईने जेवण केल्यास वजन वाढत

अन्न नेहमी व्यवस्थित चावून खाल्लं पाहिजे. ही एक चांगली सवय आहे. पण अन्न घाईघाईने खाणं एक चुकीची सवय आहे. अन्न नेहमी शांतपणे चावून खावं. घाईघाईने खाल्ल्यास मेटाबॉलिक डिसऑर्डर होण्याचा धोका खूप जास्त वाढतो. याने तुमचं मेटाबॉलिज्म स्लो होतं, अशात शरीरात फॅट जमा होऊ लागतं. ही सवय वेळीच सोडली नाही तर तुम्ही लवकर लठ्ठपणाचे शिकार होऊ शकता. अन्न व्यवस्थित हळुवार चावून खाणाऱ्यांच्या तुलनेत घाईघाईने खाणाऱ्यांना मेटाबॉलिज्म डिसऑर्डरचा धोका ४०० टक्के अधिक जास्त असतो.

घाईघाईने जेवण केल्यास कसं वाढतं वजन

जेव्हा तुम्ही अन्न हळूहळू चावून खाता तेव्हा पोट मेंदुला संकेत देतो की, तुमचं पोट भरलेलं आहे. मात्र, घाईघाईने जेवण करत असाल तर तुम्ही ओव्हरईटिंग करता, ज्यामुळे तुमचं वजन वाढतं.

हळूहळू खाण्याची सवय कशी लावाल

अन्न हळूहळू चावण्याची सवय लावण्यासाठी जेवण करताना टीव्ही किंवा मोबाईल बघणं टाळावं. तसेच जेवण करण्यासाठी जास्त वेळ द्या. घाईघाईने जेवण करू नका. जेवण करताना तुमचं लक्ष केवळ जेवणावर असलं पाहिजे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

13 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

13 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

13 तास ago

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

22 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

22 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

22 तास ago