आरोग्य

रोज सकाळी प्या १ कप ‘गुलाबी चहा’! दिवसभर थकवा गायब, स्ट्रेस होईल कमी-चेहऱ्यावर येईल ग्लो

अनेकांच्या दिवसाची सुरुवात सकाळच्या चहा किंवा कॉफीने होते. सकाळी चहा प्यायल्याने आपल्याला दिवसभर फ्रेश वाटते. तसेच शरीरात वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होते.

अशातच सध्या गुलाबी चहाचा ट्रेंड वाढताना दिसून येत आहे. हा चहा फक्त चवीला उत्तम नाही तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.

गुलाबी चहा विशेषत: काश्मिरी चहा म्हणून ओळखला जातो. या चहामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच वजन कमी होण्यास देखील मदत होते.

रोज कपभर गुलाबी चहा प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहातो तर मानसिक तणाव देखील कमी होतो.

गुलाबी चहामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात जे शरीराला होणाऱ्या हानिकारक घटकांपासून वाचवतात. या चहामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असल्यामुळे वजन देखील वाढत नाही.

गुलाबी चहा प्यायल्याने रक्तवाहिन्यांमधील कोलेस्ट्रेरॉल कमी होऊन हृदयविकार आणि रक्तवाहिन्यासंबंधी होणारा रोगांचा धोका कमी होतो.

या गुलाबी चहामध्ये गुलाबाच्या पाकळ्या, मध, पाणी, दालचिनी आणि वेलची असल्यामुळे याचा सुगंध चांगला असतो. त्यामुळे मानसिक तणाव कमी होऊन मन शांत होते.

गुलाबी चहामध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण असते. त्यामुळे याचा आपल्या त्वचेला फायदा होतो. यात असणारे एंटी-इंफ्लेमेटरी गुण आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

11 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

11 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

11 तास ago

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

19 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

20 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

20 तास ago